Author

मकरंद साठे | Makarand Sathe

मकरंद साठे हे एक मराठी नाटककार, लेखक व नाट्यदिग्दर्शक आहेत. साठे हे व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत. असे असले तरी ते, साहित्य अकादमीच्या अनुवादित पुस्तकांच्या २०१७ सालच्या पुरस्कारांसाठीच्या निवड समितीचे सदस्य होते.[१][२] [३] भारतीय रंगभूमीवर नावीन्यपूर्ण, प्रयोगशील आणि मराठी नाटक, साहित्याला नवी दिशा, अशा तिन्ही पातळींवर चपखल बसणारे नाटककार, लेखक म्हणून मकरंद साठे सर्वपरिचित आहेत.थिएटर ॲकॅडमीने १९९० च्या दशकात आयोजिलेल्या एका कार्यशाळेत, 'चारशे कोटी विसरभोळे' या नाटकामुळे मकरंद साठे या नावाचा परिचय झाला. नाटकाच्या नावापासूनच काहीतरी वेगळा आशय मांडण्याचा प्रयत्न साठे यांनी केला. उमेदीच्या काळात प्रयोगशील निर्मिती करणारे अनेक नाटककार कालांतराने ठराविक चौकटीबाहेर पडण्यास धजावत नाहीत; पण बंदिस्त चौकटीत न अडकता प्रयोगशील निर्मितीचा ध्यास घेणाऱ्या काही मोजक्या नाटककारांमध्ये साठेंचा समावेश होतो.

प्रयोगशील वृत्ती, मराठी नाटकाला, साहित्याला नवी दिशा देणे, अशा तिन्ही पातळींवर चपखल बसणारे नाटककार, लेखक म्हणून मकरंद साठे सर्वपरिचित आहेत.

गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ रंगभूमीवर सातत्याने नवनिर्मिती करणाऱ्या पडद्यामागच्या रंगकर्मीर्च अनेक पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे. थिएटर ॲकॅडमीने १९९० च्या दशकात आयोजिलेल्या एका कार्यशाळेत, 'चारशे कोटी विसरभोळे' या नाटकामुळे मकरंद साठे या नावाचा परिचय झाला. नाटकाच्या नावापासूनच काहीतरी वेगळा आशय मांडण्याचा प्रयत्न साठे यांनी केला. उमेदीच्या काळात प्रयोगशील निर्मिती करणारे अनेक नाटककार कालांतराने ठरावीक चौकटीबाहेर पडण्यास धजावत नाहीत; पण बंदिस्त चौकटीत न अडकता प्रयोगशील निर्मितीचा ध्यास घेणाऱ्या काही मोजक्या नाटककारांमध्ये साठेंचा समावेश होतो.

Author's books

Dalpatsingh Yeti Gava (Natyasanhita) । दलपतसिंग येती गावा (नाट्यसंहिता)

60.00

एका अर्थाने, हे राजकीय प्रचाराचं नाटक आहे, पण हे कमिशन्ड नाटक असलं तरी ते प्रचारनाट्य न करता विचारनाट्य होईल असाच माझा प्रयत्न होता. तिसरी गोष्ट म्हणजे कोणतंही नाटक, मग ते प्रचारनाट्य असो, विचारनाट्य असो वा अगदी मानवी भाव-भावनांना भिडणारं नाटक असो, ते उत्तम नाटक असलं पाहिजे. ते बुद्धीला तर भिडलं पाहिजेच, पण भावनांनाही भिडलं पाहिजे.

– मकरंद साठे (मुलाखतीतून)

     

Saleनवी पुस्तके

टॉकिंग पॉलिटिक्स | Talking politics

160.00

एक तत्त्वज्ञ म्हणून भिखू पारेख यांनी आपली उभी हयात उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्यात घालवली, कारण तत्त्वज्ञानाचा अर्थच तो असतो. आपल्या तत्त्वज्ञानाबाबत आणि तात्विक भूमिकांबद्दल ते नेहमीच दृढ आणि सुसंगत राहत आले आहेत, हे त्यांचा जीवनप्रवास पहिल्यांना पुरेपूर माहीत आहे. आयुष्याची पन्नासहून अधिक वर्षे त्यांनी समानतेबाबतच्या तत्त्वचिंतनासाठी आणि समानतेसाठीच्या प्रत्यक्ष लढ्यासाठी वेचली आहेत. तात्विक दृष्ट्या गहन आणि नैतिक दृष्ट्या बांधिलकी मांडणाऱ्या त्यांच्या चिंतनाची व्यापक पातळीवर प्रशंसा झालेली आहे आणि हे चिंतन मूलगामी स्वरूपाचे आहे असे मानले गेले आहे. त्यांच्या आयुष्याची आणि विचारांची ओळख करून देणारे हे संवादरुपी पुस्तक म्हणजे माझ्या मनात त्यांच्याविषयी असलेल्या आदराची निशाणी आहे. त्यांचा वैचारिक वारसा असे या पुस्तकाबाबत बोलणे हे अकाली होईल, पण कल्पनाही करता येणार नाही इतक्या व राजकीय शक्यतांचा पट त्यांनी इथे उघड केला आहे.