एकनाथांनी सांगितलं होतं, “रोग गेलियाचे लक्षणे, रोगी नेणे, वैद्य जाणे” त्याप्रमाणे लोहिया यांनी ‘रुग्णांच्या चष्म्यातून’ सध्याची वैयक्तिक व सामाजिक आरोग्यावस्था दाखवत त्यातून सुव्यवस्थेकडे जाण्याचे सूचनही केलं आहे. हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. डॉ. लोहिया यांचे वाचन अद्ययावत असल्यामुळे त्यांनी प्रत्येक प्रकरणाचा आरंभ हा नेमक्या व चपखल अवतरणाने केला आहे. त्यातून विशाल विचारपटाची पार्श्वभूमी तयार होते. हे पुस्तक, वाचकाला एकाच वेळी डॉक्टर व रुग्ण ह्या दोघांच्या चष्म्यातून पाहण्याची काळानुरूप दृष्टी देण्याचं कार्य करणार आहे.
या कथा आहेत रोगांच्या रोग्यांच्या आणि डॉक्टरांच्या त्यांनी अनुभवलेल्या भावनांच्या, विचारांच्या आणि तत्त्वज्ञानाच्या. या कथा सांगितल्या आहेत रुग्णांच्या चष्म्यातून, आणि डॉक्टरांच्याही ! त्या नवा दृष्टिकोन देतील.
– डॉ अभय बंग
Weight
0.12 kg
Dimensions
14 × 1 × 21.5 cm
Size
M, S
Pages
119
4 reviews for Rugnanchya Chashmyatun | रुग्णांच्या चष्म्यातून
Rated 5 out of 5
Gopal Rathi –
खूपच सुंदर लिखाण आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे लिखाण इमॅजिनेशन नसुन प्रत्यक्ष व्यक्तीच्या अनुभवातून लिहिल्या गेलेले आहेत. त्यामुळे त्यातली खोली व भाव मनाला खूप स्पर्श करून जातात.
वाचनीय पुस्तक.
सगळ्यांनी एक एक प्रत तरी घ्यावी
Rated 5 out of 5
Ameya Ladda (verified owner)–
डॉक्टर आणि हॉस्पिटल हे स्वतःतच एक वेगळं विश्व असतं. आणि नाही म्हटलं तरी प्रत्येकाचा याच्याशी आयुष्यात संबंध येतोच.
डॉक्टर, पेशंट व त्यांचे नातेवाईक या सगळ्यांची त्या वेळेची मानसिकता व त्यातून आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांची शिदोरी असलेले हे पुस्तक वाचकाला समृद्ध करते आणि नवा दृष्टिकोन सुद्धा देते.
Worth Reading! 👍🏻
Rated 5 out of 5
Naresh Ubale. –
डॉक्टर जेव्हा त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरु करतात व जसजसे ते त्यात रमतात.या काळात रुग्णांकडून ते कसे शिकत जातात व हळूहळु चांगले डॉक्टर म्हणून कसे तयार होतात याचा लेखाजोखा या पुस्तकात वाचायला मिळतो.हा एक खूप वेगळा दृष्टिकोन या पुस्तकात वाचायला मिळतो.थोडक्यात रुग्णही डॉक्टरला कसे घडवत असतात हा नवीन दृष्टिकोन या पुस्तकाच्या रूपाने डॉक्टर असलेल्या लेखिकेने मांडला आहे.
सुंदर पुस्तक आहे.
अ. के. भागवत आणि ग. प्र. प्रधान यांनी १९५६ मध्ये लिहिलेल्या लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी चरित्राचं मराठी भाषांतर करण्याचं काम सदर भाषांतरकाराकडे आलं. भाषांतर करताना काही विशिष्ट शब्दांवर अधिक रेंगाळणं होतं. परक्या भाषेतल्या या काही शब्दांसाठी आपल्या भाषेत काही रूढ शब्द असतात, काही वेळा तसे शब्द नसतातही. काही वेळा असे रूढ प्रतिशब्द सहज उपलब्ध असले तरी ते पटत नाहीत, अपुरे वाटतात. अशा वेळी भाषांतरकारासमोरची गुंतागुंत वाढते. या पुस्तिकेमध्ये ही गुंतागुंत मांडली आहे.
आज एकविसाव्या शतकात एवढे संशोधन होऊनही चार्वाकांचा एकही ग्रंथ संशोधकांना सापडला नाही, त्यांची परंपरा समजली नाही की तिचे अवशेष हाती लागले नाहीत. धर्म व सत्ता यांना केलेला विरोध चार्वाकांना सारे काही गमावण्यापर्यंत घेऊन गेला. हिंदू धर्म त्याच्या सहिष्णुतेसाठी प्रसिद्ध आहे. त्याने इतर धर्मांचे ग्रंथ जपले… पण चार्वाकांचा एकही ग्रंथ ठेवला नाही… कारण इतर धर्म कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ईश्वर, मंदिर व भक्ती मानत होते. चार्वाकांचा लढाच त्याविरुद्ध होता.
गोविंदराव तळवळकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये ‘वाचता वाचता’ हा स्तंभ ‘वाचस्पती’ या टोपणनावाने लिहिला, तो नंतर प्रेस्टीज प्रकाशनाकडून पुस्तकरूपाने १९७९ मध्ये आला होता. त्या पुस्तकाची नवी आवृत्ती साधनाकडून, हार्डबाऊंडमध्ये.
डिसेंबर 2015 मध्ये, पुणे शहरात राहणारी तीन मुले (आदर्श पाटील, विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळे) ‘माणूस’ समजून घेण्यासाठी भामरागडच्या पलीकडे, छत्तीसगडच्या परिसरातील दंडकारण्यात – आदिवासींच्या प्रदेशात- सायकल प्रवास करीत गेले. मित्रांनी, ज्येष्ठांनी, कार्यकर्त्यांनी, पोलिसांनीही ‘तो डेंजर झोन आहे’ असे सांगितले असूनही हे तिघे गेले… आणि नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या आदिवासी गावांत/पाड्यांवर त्यांना थांबवून ठेवण्यात आले. चार दिवसांनंतर (पोलिसांचे खबरे नाहीत अशी खात्री पटल्यावर), त्यांना सोडून देण्यात आले.
तोपर्यंत ‘तीन तरुणांचे अपहरण झाल्याच्या बातम्या’ महाराष्ट्रात झळकल्या… आणि त्यांच्या सुटकेसाठी सरकारी पातळीवर प्रयत्न जारी करण्यात आले. त्या तीन तरुणांची ‘त्या’ चार दिवसांची डायरी, त्या सफरीचे मागचे पुढचे संदर्भ, प्रांजळ आत्मनिवेदन आणि ना भरपूर रंगीत छायाचित्रांचा समावेश असलेले, आदिवासींच्या न जीवनात डोकावणारे अत्यंत वाचनीय पुस्तक.
तीन मुलांचे चार दिवस (अनुभवकथन) – आदिवासी प्रदेशात सायकलयात्रा करत गेलेले तीन तरुण सांगताहेत, नक्षलवाद्यांनी धरून ठेवले त्या चार दिवसांच्या मागचे-पुढचे अनुभव.
जेष्ठ पत्रकार – संपादक गोविंदराव तळवलकर यांचे व्यक्तित्व, त्यांचे वाचन, लेखन, संपादन आणि त्यांना असलेली बागकामाची व पशुपक्ष्यांची आवड याविषयी त्यांच्या मुलींनी लिहलेले पुस्तक.
Gopal Rathi –
खूपच सुंदर लिखाण आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे लिखाण इमॅजिनेशन नसुन प्रत्यक्ष व्यक्तीच्या अनुभवातून लिहिल्या गेलेले आहेत. त्यामुळे त्यातली खोली व भाव मनाला खूप स्पर्श करून जातात.
वाचनीय पुस्तक.
सगळ्यांनी एक एक प्रत तरी घ्यावी
Ameya Ladda (verified owner) –
डॉक्टर आणि हॉस्पिटल हे स्वतःतच एक वेगळं विश्व असतं. आणि नाही म्हटलं तरी प्रत्येकाचा याच्याशी आयुष्यात संबंध येतोच.
डॉक्टर, पेशंट व त्यांचे नातेवाईक या सगळ्यांची त्या वेळेची मानसिकता व त्यातून आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांची शिदोरी असलेले हे पुस्तक वाचकाला समृद्ध करते आणि नवा दृष्टिकोन सुद्धा देते.
Worth Reading! 👍🏻
Naresh Ubale. –
डॉक्टर जेव्हा त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरु करतात व जसजसे ते त्यात रमतात.या काळात रुग्णांकडून ते कसे शिकत जातात व हळूहळु चांगले डॉक्टर म्हणून कसे तयार होतात याचा लेखाजोखा या पुस्तकात वाचायला मिळतो.हा एक खूप वेगळा दृष्टिकोन या पुस्तकात वाचायला मिळतो.थोडक्यात रुग्णही डॉक्टरला कसे घडवत असतात हा नवीन दृष्टिकोन या पुस्तकाच्या रूपाने डॉक्टर असलेल्या लेखिकेने मांडला आहे.
सुंदर पुस्तक आहे.
Naresh Ubale. –
छान पुस्तक आहे