साहित्य

न पेटलेले दिवे | Na Petlele Dive

120.00
न पेटलेले दिवे (व्यक्तिचित्रे) – लेखकाला त्याच्या आयुष्यात भेटलेली अशी 14 लहान मुले-मुली जी खूप चमकदार होती, पण अकाली विझली.

     

कैफियत | Kaifiyat

140.00
कैफियत (लेखसंग्रह) – माणूस, प्राणी, पक्षी आणि एकूणच निसर्गाची कैफियत मांडणारे आणि सभोवतालाकडे सजगतेने पाहायला शिकवणारे ललित लेख.

     

माझे विद्यार्थी | Majhe Vidhyarthi

140.00
माझे विद्यार्थी (व्यक्तिचित्रे) – एका प्राथमिक शिक्षकाला त्याच्या कारकिर्दीत भेटलेली काही अफलातून यशस्वी व अयशस्वी मुले-मुली.

         

बहादूर थापा आणि इतर कविता | Bahadur Thapa Aani Itar Kavita

140.00
बहादूर थापा (कवितासंग्रह) – आपल्या सभोवताली असतात, पण त्यांचे अस्तित्व आपण गृहीतच धरत नाही अशा 25 व्यक्तींवरील कविता.

           

भारतीय भाषा आणि साहित्य | Bhartiya Bhasha Ani Sahitya

200.00
भारतीय भाषा आणि साहित्य (लेखसंग्रह) – भारतीय संविधानाने 22 भाषांना ‘राजभाषा’ अशी मान्यता दिली आहे. त्या सर्व भाषा आणि त्यांतील साहित्य यांचा परिचय करून देणाऱ्या लेखांचा संग्रह.

     

स्वामीनाथन : भूकमुक्तीचा ध्यास | Swaminathan : Bhukmukticha Dhyas

240.00
स्वामीनाथन : भूकमुक्तीचा ध्यास (चरित्र) – हरित क्रांतीच्या प्रणेत्यांपैकी एक असलेले कृषीवैज्ञानिक एम. एस. स्वामीनाथन यांचे व्यक्तित्व, विचार व कार्य यांचा वेध घेणारे पुस्तक.

     

कोsहम | Ko ham

200.00
कोsहम (कादंबरी) – ‘मी कोण’ या प्रश्नापासून तत्त्वज्ञान सुरु होते, त्याचा वेध घेणारी ललितरम्य व उद्बोधक कादंबरी.

     

केला होता अट्टहास | Kela Hota Attahas

240.00

‘केला होता अट्टहास’ म्हणजे हिंदी साहित्यिक शिवदयाल यांच्या “एक और दुनिया होती” या कांदबरीचा अनुवाद.

कादंबरीचं कथानक अनेक व्यक्तिरेखांच्या परस्परसंबंधातून विणलं गेलं आहे आणि त्यात मुख्यतः अन्याय्य समाजव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणारे, परिवर्तनाचा ध्यास घेऊन आपलं आयुष्य खर्ची घालणारे, ‘समग्र क्रांती’च्या विचारांनी भारलेले तरुण आहेत. तरुणांची ही संघटना, कसेल त्याला जमीन देण्यासाठी जमिनींशी संबंधित लढ्यांमध्ये कार्यरत आहे. सत्तर ऐंशीच्या दशकातील चळवळींप्रमाणेच आजही जमिनींचे प्रश्न, विस्थापितांचे प्रश्न, आरक्षणांचे, बेकारांचे प्रश्न अशा वेगवेगळ्या कारणांनी चळवळी सुरूच आहेत. कधी स्थानिक पातळीवर तर कधी व्यापक स्वरूपात. यांच्या मुळाशी फक्त राजकारणच असतं. असंही नाही. म्हणूनच समकालीन वास्तवातही ही कादंबरी महत्त्वाची वाटते.

     

1 3 4 5 9