लेखसंग्रह

Saleनवी पुस्तके

१५५ सदाशिव पेठ, सातारा | 155 Sadashiv Peth, Satara

300.00

कुटुंबसंस्थेमुळे भारतीय समाज टिकून राहिला, हे सर्वांनी मान्य केले आहे. अगदी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत महाराष्ट्रात आणि देशात अनेक कर्तृत्ववान कुटुंबे पाहायला मिळतात.

साताऱ्याचे दाभोलकर हे महाराष्ट्रातले एक असे प्रमुख कुटुंब. महाराष्ट्राचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास लिहिताना दाभोलकरांची दखल घ्यावीच लागते.

या कुटुंबातील अनेकांशी माझा सहज योग जुळून आला. अगदी अलीकडेपर्यंत या मंडळींचे दर दोन वर्षांनी संमेलन भरत असे; त्यातही एकदा मी थोडा सहभागी झालो होतो. हे कुटुंब एकत्र राहिले याचे श्रेय माई आणि देवदत्त यांच्याइतकेच इतरांनाही आहे.

आपल्या देशात एकत्र कुटुंबे राजकारण, शिक्षण, उद्योग, व्यापार, वैद्यक या क्षेत्रांत बहुसंख्येने आहेत. मात्र प्रत्येक कुटुंब एकाच क्षेत्रात असते. दाभोलकर कुटुंबाचे उलट आहे.

तत्त्वज्ञान, विज्ञान, अर्थशास्त्र, शिक्षण, शेती, वैद्यक, मूलभूत संशोधन, संस्कृती, समाजप्रबोधन आणि परिवर्तनाच्या चळवळी इतक्या विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या दाभोलकर कुटुंबाचे साम्य एकोणिसाव्या शतकामधल्या रवीन्द्रनाथ टागोरांच्या कुटुंबाशीच आहे. त्यामुळे भानू काळे आणि अनिल जोशी यांनी दाभोलकर परिवाराचे विविधरंगी दर्शन घडवणाऱ्या या पुस्तकाचे संपादन करून मराठी साहित्याची श्रीमंती वाढवली आहे.

विनय हर्डीकर

Saleनवी पुस्तके

बाभळीच्या बाया | Babhalichya Baya

200.00

“प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वच लोकांना हे वाटत होतं की, मी तिथे नोकरीला लागल्याने माझ्या बायांच्या आयुष्यात खूप फरक पडलाय, त्यांची प्रगती झालीये, त्यांचं भलं झालंय. पण हे पूर्ण सत्य नाहीये. लेखमालिकेत निसटून गेलेला माझ्या जडणीघडणीचा भाग मी या पुस्तकात मांडलाय. जेवढा परिणाम माझ्यामुळे त्यांच्या आयुष्यात झाला, त्यापेक्षा कैकपटीने जास्त माझ्या आयुष्यात झाला. आत्मसन्मान आणि नैराश्याने भरलेल्या माझ्या आयुष्याला त्यांनी पाठीचा कणा दिला, संघर्षाचं बळ दिलं. माझा अतिशय खचलेला, आतला पैलू मी ‘सुरवंट ‘मधून मांडलाय. ते लिहिताना मला धाडस लागलं, पोटात कालवाकालव झाली, पण वाटलं लिहू या… कारण हा प्रवास केवळ माझ्या बायांचाच नव्हता. आमच्या विदर्भात सर्वांत कोरड्या, उष्ण भागातही जे झाड तग धरून उभं राहतं ते म्हणजे बाभूळ. त्याला स्वतःचं अस्तित्व टिकवता येतं… अगदी माझ्या बायांसारखं”

Saleनवी पुस्तके

सोन्याची मग होईल धरणी | Sonyachi Mag Hoil Dharani

250.00

या पुस्तकाचे शीर्षक मी बा. भ. बोरकर यांच्या बालपणी वाचलेल्या आणि माझ्या विशेष स्मरणात राहिलेल्या, ‘गड्यांनो तृणबाळे होवू’ या कवितेमधून घेतले आहे.

कवितेमधील ‘सोन्याची मग होईल धरणी’ ह्या ओळीने मला खूप प्रभावित केले. कारण मी जरी तृणपात्याइतका लहान असलो तरी, या धरतीला सोन्याची करण्याचा माझा संकल्प कायमच दृढ होता. त्यासाठी लागणारी नैतिक, सामाजिक आणि बौद्धिक बांधिलकी प्रत्येक येणाऱ्या दिवसाबरोबर वाढविण्यासाठी मी झटायला तयार होतो/आहे.

पण असे विश्व किंवा अशी धरती सोन्याची करायची असेल तर जगाची वस्तुस्थिती समजण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हेसुद्धा जरुरीचे असते. शिवाय सभोवतालच्या परिस्थितीचे सातत्याने परीक्षण करताना आत्मपरीक्षण करणेसुद्धा तितकेच जरुरीचे असते.

‘परीक्षण आणि आत्मपरीक्षण’ हे पुस्तकाचे उपशीर्षक नेमकी हीच गोष्ट सुचविते. या पुस्तकात कविता, राजकारण, थोर विचारवंतांचे विचार व त्या विचारांना साकारताना त्यांनी केलेले संघर्ष आणि उच्च शिक्षणाची जगातील व भारतातील सद्यःस्थिती इत्यादी विषयांवर अभ्यासपूर्ण लेख आहेत.