गांधीविचाराची क्रांतिकारी परिवर्तनाशी नाळ जोडली गेली नाही. गांधीजींना राजश्रयी बनवण्यात गांधीवाद्यांनी, तर भांडवलदारांचे हस्तक म्हणवण्यात डाव्यांनी धन्यता मानली. काही आंबेडकरवादी प्रवाहांनी गांधींना जातिव्यवस्था-समर्थक/ मनुवादी म्हणत भांडवलशाही व हिंदुत्ववाद यांच्याऐवजी गांधीवादालाच ‘शत्रू क्रमांक एक’ मानले. परिणामी, गांधी व त्यांच्या विचारांचा सोयीस्कर वापर सुरू झाला. त्या प्रक्रियेत गांधींच्या विचारातील अनेक महत्त्वाचे पैलू अलक्षित राहिले. त्यातील काही पैलूंचा आजच्या दृष्टीकोनातून केलेला साधक-बाधक विचार या पुस्तकात आहे, गांधींकडे पाहण्याचा निराळा दृष्टीकोन यातून मिळतो
चले जाव – 1942 च्या ठरावावरील भाषणे | Chale Jao – 1942 Chya Tharawawaril Bhashne
₹70.00चले जाव (भाषणसंग्रह) – 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे ‘चले जाव’ ठराव मंजूर झाला, त्या सभेत गांधींनी केलेली तीन भाषणे आणि नेहरू, पटेल, आझाद या तिघांचे एक भाषण संकलित करण्यात आले आहे. ही ऐतिहासिक भाषणे पहिल्यांदाच पुस्तकरूपाने एकत्रितपणे प्रसिद्ध झाली आहेत.
Reviews
There are no reviews yet.