साहित्य

Sandhyasamayichya Gujgoshti | संध्यासमयीच्या गुजगोष्टी

160.00
संध्यासमयीच्या गुजगोष्टी (लेखसंग्रह) – जेष्ठ समीक्षक रा.ग. जाधव यांनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वत लिहिलेल्या-आत्मपर किंवा चिंतनपर म्हणावेत अशा-२८ ललित लेखांचा संग्रह.

     

Kaifiyat | कैफियत

140.00
कैफियत (लेखसंग्रह) – माणूस, प्राणी, पक्षी आणि एकूणच निसर्गाची कैफियत मांडणारे आणि सभोवतालाकडे सजगतेने पाहायला शिकवणारे ललित लेख.

     

Bahadur Thapa Aani Itar Kavita | बहादूर थापा आणि इतर कविता

140.00
बहादूर थापा (कवितासंग्रह) – आपल्या सभोवताली असतात, पण त्यांचे अस्तित्व आपण गृहीतच धरत नाही अशा २५ व्यक्तींवरील कविता.

           

Bhartiya Bhasha Ani Sahitya | भारतीय भाषा आणि साहित्य

160.00
भारतीय भाषा आणि साहित्य (लेखसंग्रह) – भारतीय संविधानाने २२ भाषांना ‘राजभाषा’ अशी मान्यता दिली आहे. त्या सर्व भाषा आणि त्यांतील साहित्य यांचा परिचय करून देणाऱ्या लेखांचा संग्रह.

     

Swaminathan : Bhukmukticha Dhyas | स्वामीनाथन : भूकमुक्तीचा ध्यास

240.00
स्वामीनाथन : भूकमुक्तीचा ध्यास (चरित्र) – हरित क्रांतीच्या प्रणेत्यांपैकी एक असलेले कृषीवैज्ञानिक एम. एस. स्वामिनाथन यांचे व्यक्तित्व, विचार व कार्य यांचा वेध घेणारे पुस्तक.

     

Koham | कोsहम

200.00
कोsहम (कादंबरी) – ‘मी कोण’ या प्रश्नापासून तत्वज्ञान सुरु होते, त्याचा वेध घेणारी ललितरम्य व उद्बोधक कादंबरी.

     

Kela Hota Attahas | केला होता अट्टहास

240.00

‘केला होता अट्टहास’ म्हणजे हिंदी साहित्यिक शिवदयाल यांच्या “एक और दुनिया होती” या कांदबरीचा अनुवाद.

कादंबरीचं कथानक अनेक व्यक्तिरेखांच्या परस्परसंबंधातून विणलं गेलं आहे आणि त्यात मुख्यतः अन्याय्य समाजव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणारे, परिवर्तनाचा ध्यास घेऊन आपलं आयुष्य खर्ची घालणारे, ‘समग्र क्रांती’च्या विचारांनी भारलेले तरुण आहेत. तरुणांची ही संघटना, कसेल त्याला जमीन देण्यासाठी जमिनींशी संबंधित लढ्यांमध्ये कार्यरत आहे. सत्तर ऐंशीच्या दशकातील चळवळींप्रमाणेच आजही जमिनींचे प्रश्न, विस्थापितांचे प्रश्न, आरक्षणांचे, बेकारांचे प्रश्न अशा वेगवेगळ्या कारणांनी चळवळी सुरूच आहेत. कधी स्थानिक पातळीवर तर कधी व्यापक स्वरूपात. यांच्या मुळाशी फक्त राजकारणच असतं. असंही नाही. म्हणूनच समकालीन वास्तवातही ही कादंबरी महत्त्वाची वाटते.

     

Dalpatsingh Yeti Gava (Natyanirmiti Prakriya) । दलपतसिंग येती गावा (नाट्यनिर्मिती प्रक्रिया)

100.00

या पुस्तकात ‘दलपतसिंग येती गावा’ या नाटकाविषयी फार थोडे बोलले गेले आहे, बहुतेक सर्वजण सांगत आहेत ते या नाटकाच्या निर्मितिप्रक्रियेविषयी. अरुणा रॉय यांनी राजस्थानातील देवडुंगरी या खेड्यातील मजूर-शेतकऱ्यांना घेऊन तिथल्या स्थानिक प्रस्थापितांच्या (राजकारणी, जमीनदार, प्रशासकीय अधिकारी) विरोधात दिलेला लढा आणि त्यातून उगम पावलेला माहितीच्या अधिकाराचा कायदा याची गोष्ट म्हणजे हे नाटक आहे. आणि अतुल पेठे यांनी जांबसमर्थ या गावात सात-आठ महिने तंबू ठोकून, तिथल्या लोकांना हाताशी धरून माहितीच्या अधिकारावरील जे नाटक उभे केले, त्याची हकीगत म्हणजे हे पुस्तक आहे.

     

1 2 3 4 6