सामाजिक

Saleनवी पुस्तके

न्या. म.गो.रानडे यांचे तीन ग्रंथ | Nya. M. G. Ranade Yanche Tin Granth

1,200.00

1842 ते 1901 असे 60 वर्षांचे आयुष्य न्यायमूर्ती रानडे यांच्या वाट्याला आले. त्यांच्या भाषणांचे व निबंधाचे संग्रह असलेले

1. Essays on Indian Economics.
2. Religious and Social Reforms.
3. Miscellaneous Writings.

हे तीन ग्रंथ 1896 ते 1906 या काळात प्रकाशित झाले होते.

मात्र या तिन्ही ग्रंथांचे अनुवाद मराठीत यापूर्वी कधीच झाले नाहीत.
आता या तिन्हींचे अनुवाद अनुक्रमे

1. भारतीय अर्थकारणावरील निबंध.
2. धार्मिक व सामाजिक सुधारणा.
3. संकीर्ण निबंध.

या तीन शीर्षकांखाली साधना प्रकाशनाकडून आले आहेत. अवधूत डोंगरे यांनी या तिन्ही ग्रंथांचे अनुवाद केले आहेत.
या तीन अनुवादित ग्रंथांना अनुक्रमे नीरज हातेकर, अरविंद गणाचारी व अभय टिळक यांनी विवेचक प्रस्तावना लिहिल्या आहेत.
या लेखनाचे त्या काळातील महत्त्व आणि आजच्या काळातील उपयुक्तता यांचा वेध घेण्याचा प्रयत्न तिन्ही प्रस्तावनाकारांनी केला आहे

Saleनवी पुस्तके

पत्र-पाथेय | Patra-Patheya

320.00

भूदान-ग्रामदान आंदोलन काळात विनोबांनी हजारो व्याख्याने दिली, चर्चा केल्या. त्यांनी अनेक पत्रेही लिहिली. आंदोलनाच्या प्रणेत्याचे-नेत्याचे मानस तर या पत्रांमधून प्रकट झालेले आहेच; या पत्रांमध्ये रणनीती, कार्यक्रम, कार्यशैली वगैरेंबाबतचे विचार आहेत. कार्यकर्त्यांशी व्यक्तिगत पातळीवर संवादही आहे. पत्रांमधून बरेचदा अशी सामग्री सापडते, जी मुद्रित दस्तऐवजांमध्ये नसते. लेख व भाषणे यांचे स्वतःचे महत्त्व असते. त्यांच्यात एखाद्या विषयाची मुद्देसूद मांडणी असते. पत्रांमध्ये हृद्गत प्रकट झालेले असते, अंतरीचा जिव्हाळा प्रकट झालेला असतो. पत्रलेखकाच्या आणि पत्र-प्राप्तकर्त्याच्याही स्वभावाच्या विविध पैलूंवर त्यांतून प्रकाश पडतो. म्हणूनच विनोबांची पत्रे हा भूदान-ग्रामदान आंदोलनाच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. तो वाचकांसमोर येण्याने भूदान-ग्रामदानविषयक विमर्शात मोलाची भर पडणार आहे.

परिवर्तनाचे दोन पाईक | Pariwartnache Don Paik

60.00

आजच्या विषयाचे मी दोन विभाग पाडणार आहे. विषयाची मांडणी मी अशी करू इच्छितो की, ज्या महत्त्वाच्या संकल्पना आमच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनामध्ये आहेत, त्या प्रत्येक संकल्पनेबद्दल न्या. रानड्यांचे विचार आणि फुल्यांचे विचार यांचा तौलनिक दृष्टीने परामर्श पहिल्या व्याख्यानात घ्यावा. आणि दुसऱ्या दिवशी आजच्या सामाजिक समस्यांच्या संदर्भात न्या. रानडे आणि जोतिबा फुले यांची संबद्धता काय आहे हे तपासून पाहावे. जोतिबा फुले आणि न्या. रानडे यांच्या विचारांची वर्तुळे काही ठिकाणी एकमेकांना स्पर्श करतात, तर काही ठिकाणी एकमेकांना छेद देतात. माझ्या व्याख्यानांमध्ये हे स्पर्शबिंदू आणि छेदबिंदू या दोहोंचाही मी विचार करणार आहे.

 

     

प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे । Prashna Tumcha Uttar Dabholkaranche

70.00

हत्या झाली त्याच्या चार महिने आधी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची शंभर मिनिटांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यांना सर्वत्र विचारले जाणारे ते 25 प्रश्न आणि त्यांची दाभोलकरांनी मुलाखती दरम्यान दिलेली उत्तरे यांचा समावेश या पुस्तिकेत आहे.

     

बिकट वाट | Bikat Vaat

120.00
बिकट वाट (व्यक्तिचित्रे) – सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या सहा महिलांनी प्रतिकूलतेशी संघर्ष करत केलेला समाजसन्मुख प्रवास.

     

बिजापूर डायरी | Bijapur Diary

200.00

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्हात शासकीय रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करताना डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी तिथल्या आदिवासी जनजीवन, सकारात्मक बदलाचे जे अनुभव घेतले त्याचे हे शब्दचित्रण.

           

मंच | Manch

200.00
मराठी ख्रिस्ती समाजातील अनुभवविश्वाचं व विचारांचं सुबोध ललित शैलीत प्रत्ययकारी चित्रण करणारं हे पुस्तक.या पुस्तकाच्या केंद्रस्थानी ख्रिस्ती धर्म आणि विवेकवाद या संदर्भातील चर्चा आहे.

     

Saleनवी पुस्तके

महाराष्ट्रात विनोबा | Maharashtrat Vinoba

360.00

विनोबा महाराष्ट्रात आले तोपर्यंत लाखो एकर जमीन दानात मिळाली होती. हजारो गावे ग्रामदान झाली होती.

भूदान-यज्ञादरम्यान अनेक विचार प्रकट झाले होते, अनेक कार्यक्रम पुढे आले होते. ही सगळी शिदोरी घेऊन विनोबा त्यांच्या प्रिय महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रापुढे त्यांनी हृदय मोकळे केले. यामुळेच त्यांच्या येथील अनेक भाषणांना वेगळ्याच जिव्हाळ्याचा स्पर्श आहे. या पदयात्रेतील त्यांच्या भाषणांच्या संपादनातून ‘महाराष्ट्रात विनोबा’ पुस्तकाचे चार भाग प्रकाशित झाले (1958-59).

या भाषणांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती मराठीत आहेत. भारतभरच्या पदयात्रेत महाराष्ट्र आणि गुजरातचा अपवाद वगळता विनोबा हिंदीत बोलले. फक्त महाराष्ट्रात मराठीत. त्यांची मराठी वक्तृत्वशैली या पुस्तकामध्ये दिसते तशी साहजिकच अन्यत्र दिसत नाही. विनोबांच्या विविध विषयांवरील विचारांना संकलित-संपादित करून अनेक पुस्तके विभिन्न भाषांमध्ये तयार झाली आहेत. ती उपयोगी आहेतच. मात्र मूळ भाषणांमधील खुमारी त्यांच्यात असू शकत नाही.

 

1 6 7 8 11