कॅप्टन लक्ष्मी आणि राणी झांशी रेजिमेंट (चरित्र) – नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘राणी झांसी रेजिमेंट’ची उभारणी कशी केली, त्याची रोमहर्षक कहाणी.
Sale
₹250.00 ₹200.00
₹450.00 ₹360.00
₹250.00 ₹200.00
₹150.00 ₹120.00
₹200.00 ₹160.00
₹250.00 ₹200.00
₹350.00 ₹280.00
कॅप्टन लक्ष्मी आणि राणी झांशी रेजिमेंट | Captain Laxmi Aani Rani Jhansi Regiment
Meet The Author
| Weight | 0.35 kg |
|---|---|
| Dimensions | 14 × 2 × 21.5 cm |
| Size | M, S |
| Pages | 308 |
Be the first to review “कॅप्टन लक्ष्मी आणि राणी झांशी रेजिमेंट | Captain Laxmi Aani Rani Jhansi Regiment” Cancel reply
Related products
तीन मुलांचे चार दिवस | Teen Mulanche Chaar Diwas
डिसेंबर 2015 मध्ये, पुणे शहरात राहणारी तीन मुले (आदर्श पाटील, विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळे) ‘माणूस’ समजून घेण्यासाठी भामरागडच्या पलीकडे, छत्तीसगडच्या परिसरातील दंडकारण्यात – आदिवासींच्या प्रदेशात – सायकल प्रवास करीत गेले. मित्रांनी, ज्येष्ठांनी, कार्यकर्त्यांनी, पोलिसांनीही ‘तो डेंजर झोन आहे’ असे सांगितले असूनही हे तिघे गेले… आणि नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या आदिवासी गावांत/पाड्यांवर त्यांना थांबवून ठेवण्यात आले. चार दिवसांनंतर (पोलिसांचे खबरे नाहीत अशी खात्री पटल्यावर) त्यांना सोडून देण्यात आले.
तोपर्यंत ‘तीन तरुणांचे अपहरण झाल्याच्या बातम्या’ महाराष्ट्रात झळकल्या… आणि त्यांच्या सुटकेसाठी सरकारी पातळीवर प्रयत्न जारी करण्यात आले. त्या तीन तरुणांची ‘त्या’ चार दिवसांची डायरी, त्या सफरीचे मागचे-पुढचे संदर्भ, प्रांजळ आत्मनिवेदन आणि भरपूर रंगीत छायाचित्रांचा समावेश असलेले, आदिवासींच्या जीवनात डोकावणारे अत्यंत वाचनीय पुस्तक.
तीन मुलांचे चार दिवस (अनुभवकथन) – आदिवासी प्रदेशात सायकलयात्रा करत गेलेले तीन तरुण सांगताहेत, नक्षलवाद्यांनी धरून ठेवले त्या चार दिवसांच्या मागचे-पुढचे अनुभव.
ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर | Dnyanmurti Govind Talwarkar
जेष्ठ पत्रकार – संपादक गोविंदराव तळवलकर यांचे व्यक्तित्व, त्यांचे वाचन, लेखन, संपादन आणि त्यांना असलेली बागकामाची व पशुपक्ष्यांची आवड यांविषयी त्यांच्या मुलींनी लिहिलेले पुस्तक.
मी भरून पावले आहे । Mi Bharun Pavale Aahe
मी भरून पावले आहे (आत्मचरित्र) – साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी त्यांच्या दोन दशकांतील सहजीवनाचे केलेले प्रांजळ आत्मनिवेदन.
टॉलस्टॉय यांच्याशी पत्रसंवाद | Tolstoy Yanchyashi Patrasanwad
आपणास जगातून अनेक जण पत्रं लिहीत असत आणि आपण सर्व पत्रांची दखल घेऊन, बऱ्याच पत्रांना उत्तरे लिहीत होतात. हे माहीत असल्यामुळेच मी आपणास काही पत्रं लिहिणार आहे. आपल्या उदात्त जीवनाशी माझा जो भावबंध आहे, त्यामुळेच मला हे करावेसे वाटते. या पत्रांमुळे हा भावबंध अधिक दृढ होईल आणि माझ्या जीवनाच्या या संध्यासमयी तो मला मोठा आधार वाटेल.
लाल श्याम शाह | Lal Shyam Shah
सुदीप ठाकूर यांचे हे पुस्तक विविध व्यक्तींच्या मुलाखती, सरकारी कागदपत्रे, पुस्तके, आणि अहवाल यावर आधारित आहे. खूप सावधपणे केलेल्या संशोधनाबरोबरच खूप प्रेमाने लिहिलेले हे पुस्तक म्हणजे एका असाधारण भारतीयाला वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली आहे.
लाल श्याम शाह हे मध्य भारतातील आदिवासींचा आवाज होते, त्यांचा अंतरात्मा होते. ते सही करताना त्यांच्या नावाच्या बरोबर ‘आदिवासी’ हा शब्दही लिहीत असत. ‘लाल श्याम शाह, आदिवासी’ असे ते गर्वाने आणि निर्भयतापूर्वक लिहीत असत. आपल्या लोकांविषयी, समाजाविषयी पूर्ण एकरूपता आणि बांधिलकी दाखवण्याचा तो एक मार्ग होता. आजच्या राजकीय नेत्यांच्या विपरीत त्यांचे वर्तन म्हणावे लागेल. कारण त्यांनी स्वतःच्या राजकीय आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नाही, तर आपल्या समाजाच्या स्वाभिमानासाठी संघर्ष केला. त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी, त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हावा यासाठी, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व पटावे व तरुण पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी हे पुस्तक मोठ्या प्रमाणात वाचले जायला हवे.
– रामचंद्र गुहा (प्रस्तावनेतून)
मुका म्हणे… | Muka Mhane…
मुकुंद टाकसाळे यांनी ‘वाङ्मयवृत्त’ या मासिकासाठी ‘तिरपागड’ आणि ‘साधना’ साप्ताहिकासाठी ‘मुका म्हणे…’ या नावाने सदरे लिहिली, त्यांतील निवडक ललित लेखांचा हा संग्रह आहे. वर्तमानातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटना-घडामोडींच्या निमित्ताने केलेले हे लेखन आहे.






Reviews
There are no reviews yet.