Shop

Saleनवी पुस्तके

बोधाचा जोडला तारा | Bodhacha Jodala Tara

280.00

“साहित्याची सगळ्यात मोठी ताकद त्याच्या संदिग्धतेमध्ये आहे. निसंदिग्ध, उघडं करून, सगळं स्पष्ट करून सांगणं ही साहित्याची पद्धत नाही. लेखक संदिग्धपणे सांगणार. ते प्रतीत होणं, समजणं आणि त्यात जे स्पष्टपणे म्हटलेलं नाही तेसुद्धा जाणवणं; ही प्रक्रिया वाचकांच्या मनात होणार. ती पूर्णत्वाला गेली की, त्याचा आनंद खूप मोठा असतो.”

“साहित्य आणि सामाजिक जाणीव या परस्परविरोधी गोष्टी नाहीत… सामाजिक जाणीव ही साहित्याची सहज, सुलभ अशी सहचारिणी आहे. त्यामुळे एकाच मनात त्या सुखाने नांदू शकतात. दुराग्रही, झापडबंद विचारांचं साहित्याला ओझं होतं, पण सामाजिक जाणिवेचं नाही.”

“समाज पुरेसा मोकळा, आधुनिक आणि उदारमतवादी पाहिजे; तर मग साहित्य बहरून येऊ शकतं. समाज अस्मितावादी, स्वकेंद्री, संकुचित आणि आतल्या आत बघणारा झाला, तर त्याचा साहित्यावर विपरीत परिणाम होईल.”

…मिलिंद बोकील यांच्याशी संवाद

Saleनवी पुस्तके

१५५ सदाशिव पेठ, सातारा | 155 Sadashiv Peth, Satara

300.00

कुटुंबसंस्थेमुळे भारतीय समाज टिकून राहिला, हे सर्वांनी मान्य केले आहे. अगदी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत महाराष्ट्रात आणि देशात अनेक कर्तृत्ववान कुटुंबे पाहायला मिळतात.

साताऱ्याचे दाभोलकर हे महाराष्ट्रातले एक असे प्रमुख कुटुंब. महाराष्ट्राचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास लिहिताना दाभोलकरांची दखल घ्यावीच लागते.

या कुटुंबातील अनेकांशी माझा सहज योग जुळून आला. अगदी अलीकडेपर्यंत या मंडळींचे दर दोन वर्षांनी संमेलन भरत असे; त्यातही एकदा मी थोडा सहभागी झालो होतो. हे कुटुंब एकत्र राहिले याचे श्रेय माई आणि देवदत्त यांच्याइतकेच इतरांनाही आहे.

आपल्या देशात एकत्र कुटुंबे राजकारण, शिक्षण, उद्योग, व्यापार, वैद्यक या क्षेत्रांत बहुसंख्येने आहेत. मात्र प्रत्येक कुटुंब एकाच क्षेत्रात असते. दाभोलकर कुटुंबाचे उलट आहे.

तत्त्वज्ञान, विज्ञान, अर्थशास्त्र, शिक्षण, शेती, वैद्यक, मूलभूत संशोधन, संस्कृती, समाजप्रबोधन आणि परिवर्तनाच्या चळवळी इतक्या विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या दाभोलकर कुटुंबाचे साम्य एकोणिसाव्या शतकामधल्या रवीन्द्रनाथ टागोरांच्या कुटुंबाशीच आहे. त्यामुळे भानू काळे आणि अनिल जोशी यांनी दाभोलकर परिवाराचे विविधरंगी दर्शन घडवणाऱ्या या पुस्तकाचे संपादन करून मराठी साहित्याची श्रीमंती वाढवली आहे.

विनय हर्डीकर

मानवजातीची कथा | Manavjatichi Katha

320.00

या पुस्तकात इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी मांडल्या आहेत. त्या-त्या घडामोडीतील महत्त्वाच्या व्यक्तींभोवती त्या-त्या घडामोडी रंगविल्या आहेत. या जगात स्थूल दृष्टीने दोन प्रकारचे नेते आढळतात : 

संस्कृती व सुधारणा यांना पुढे नेणारे आणि त्यांना मागे खेचणारे. शांतीचे पुरस्कर्ते पहिल्या वर्गात येतात. युद्धे पेटविणारे दुसऱ्या वर्गात येतात. जे मोठमोठे धर्मसंस्थापक होऊन गेले, त्यांनी ‘शांतीनेच खरी प्रगती होते’ या तत्त्वावरील आपली श्रद्धा आपल्या जीवनात उत्कटपणे दाखविलेली आहे. इतिहासाचे नीट निरीक्षण केल्यास आपणास कबूल करावे लागेल, की धर्मसंस्थापकांची ही श्रद्धा यथार्थ आहे. ही श्रद्धा म्हणजे केवळ धर्मग्रंथांतील आशावाद नव्हे; ही श्रद्धा स्वतः सिद्ध असे इतिहासातील एक सत्य आहे.

‘शांतीचे दूतच पृथ्वीचे वारसदार होतील’ हा दृष्टिकोन ‘मानवजातीची कथा’ हे पुस्तक लिहिताना डोळ्यांसमोर आहे.

     

वाचता वाचता । Vachata Vachata

320.00

गोविंदराव तळवळकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये ‘वाचता वाचता’ हा स्तंभ ‘वाचस्पती’ या टोपणनावाने लिहिला, तो नंतर प्रेस्टीज प्रकाशनाकडून पुस्तकरूपाने 1979 मध्ये आला होता. त्या पुस्तकाची नवी आवृत्ती साधनाकडून हार्डबाऊंडमध्ये.

            

Saleनवी पुस्तके

पक्षी उन्हाचा – सात विद्यापीठांच्या आवारात | Pakshi Unhacha – Sat Vidyapithanchya Aawarat

320.00

विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक आणि प्रशासक या पाच प्रकारच्या भूमिका निभावताना डॉ. राजन हर्षे यांनी पुणे, जेएनयू (दिल्ली), सियान्स पो (पॅरिस), कोलंबिया (न्यू यॉर्क), हैदराबाद, अलाहाबाद आणि एसएयू (दिल्ली) या सात विद्यापीठांच्या आवारात मुशाफिरी केली आहे. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन हा ध्येयवाद त्या सर्व भूमिकांना जोडणारा दुवा होता. तब्बल पाच दशकांच्या त्या प्रवासाचे एका जिप्सी वृत्तीने केलेले हे आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण आहे. या पुस्तकात बारा दीर्घ लेख आहेत. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टीकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाज जीवनावर भाष्य हे चार घटक या लेखनाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे हे पुस्तक आत्मकथनात्मक वाटेल, प्रत्यक्षात हे एक प्रकारचे कार्यकथन आहे. मोठ्या निष्ठेने व सचोटीने कार्यरत राहताना, परिपूर्णतेचा ध्यास कसा बाळगता येतो आणि उपलब्ध अवकाशात किती परिणामकारक काम करता येते, याचे प्रतिबिंब या पुस्तकात दिसेल.

 

       

गांधींविषयी (खंड 3)-गांधी: खुर्द आणि बुद्रुक | Gandhinvishyi (Khand 3)-Gandhi: Khurd Ani Budruk

320.00

गेल्या शंभर वर्षांतील मराठी भाषेमधील गांधींविषयक गंभीर वैचारिक साहित्यातून आजच्या काळाच्या संदर्भात महत्त्वाचे ठरणारे लेख या प्रकल्पासाठी निवडले. हे अतिशय महत्त्वाचे आणि भावी काळाचा वेध घेणारे चिंतन आहे. समाजाविषयी आस्था बाळगणाऱ्या सर्वांसाठी पुढील काही दशके उपयुक्त ठरू शकेल, असा हा त्रिखंडात्मक ग्रंथरूपी खजिना आहे.

‘गांधी : खुर्द आणि बुद्रुक’ या तिसऱ्या खंडात भाषा, विज्ञान, जीवनशैली यांसारख्या गांधीजींच्या जीवनातील विविध विषयांना स्पर्श केला आहे. गांधी विचारांच्या परिपूर्ण आकलनासाठी या वेगवेगळ्या विषयांतून भेटणारे गांधी महत्त्वाचे आहेत. जणू काही कॅलिडोस्कोपमधील अनेक पैलूंतून निर्माण होणारी सुघड आकृती. म्हणूनच येथे अनेक खुर्दमधून आपल्याला आकळतात बुद्रुक गांधी.

पत्र-पाथेय | Patra-Patheya

320.00

भूदान-ग्रामदान आंदोलन काळात विनोबांनी हजारो व्याख्याने दिली, चर्चा केल्या. त्यांनी अनेक पत्रेही लिहिली. आंदोलनाच्या प्रणेत्याचे-नेत्याचे मानस तर या पत्रांमधून प्रकट झालेले आहेच; या पत्रांमध्ये रणनीती, कार्यक्रम, कार्यशैली वगैरेंबाबतचे विचार आहेत. कार्यकर्त्यांशी व्यक्तिगत पातळीवर संवादही आहे. पत्रांमधून बरेचदा अशी सामग्री सापडते, जी मुद्रित दस्तऐवजांमध्ये नसते. लेख व भाषणे यांचे स्वतःचे महत्त्व असते. त्यांच्यात एखाद्या विषयाची मुद्देसूद मांडणी असते. पत्रांमध्ये हृद्गत प्रकट झालेले असते, अंतरीचा जिव्हाळा प्रकट झालेला असतो. पत्रलेखकाच्या आणि पत्र-प्राप्तकर्त्याच्याही स्वभावाच्या विविध पैलूंवर त्यांतून प्रकाश पडतो. म्हणूनच विनोबांची पत्रे हा भूदान-ग्रामदान आंदोलनाच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. तो वाचकांसमोर येण्याने भूदान-ग्रामदानविषयक विमर्शात मोलाची भर पडणार आहे.

Saleनवी पुस्तके

समाज, राजकारण, कला | Samaj, Rajkaran, Kala

320.00

1931 ते 2012 असे 80 वर्षांचे आयुष्य लाभलेले राम बापट अर्धशतकाहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय होते. त्यांची ओळख प्रामुख्याने, पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि सामाजिक व राजकीय संस्था-संघटनांचे खंबीर पाठीराखे अशी होती. पण त्यांना इतिहास, समाजशास्त्र, मानव्य शास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी विषयांत असलेली गती थक्क करणारी होती. शिवाय, साहित्य, नाटक, सिनेमा यांचे ते साक्षेपी समीक्षक होते. त्यामुळे व्हर्सटाइल जिनियस असे त्यांच्याबाबत म्हणता येते. त्यांच्या स्मृतीनिमित्त, 2013 ते 2023 या दशकभरात दरवर्षी एक याप्रमाणे व्याख्याने आयोजित करण्याचे काम मकरंद साठे व गजानन परांजपे या दोघांनी हाती घेतले व पार पाडले. त्या व्याख्यानमालेत देशभरातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना निमंत्रित केले गेले. अभ्यासपूर्ण व मर्मग्राही अशी ती व्याख्याने इंग्रजीतून झाली. त्या व्याख्यानांचे अनुवाद व संपादन करून तयार केलेले हे पुस्तक आहे.

1 25 26 27 30