शिंग फुंकिले रणी | Shing Funkile Rani
₹120.00जिथे जिथे
भारतावर प्रेम करणाऱ्या
माझ्या बंधुभगिनींचे
समुदाय जमतात
तिथे तिथे ही गाणी
खुशाल कोणीही म्हणावीत…


जिथे जिथे
भारतावर प्रेम करणाऱ्या
माझ्या बंधुभगिनींचे
समुदाय जमतात
तिथे तिथे ही गाणी
खुशाल कोणीही म्हणावीत…
कुटुंबसंस्थेमुळे भारतीय समाज टिकून राहिला, हे सर्वांनी मान्य केले आहे. अगदी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत महाराष्ट्रात आणि देशात अनेक कर्तृत्ववान कुटुंबे पाहायला मिळतात.
साताऱ्याचे दाभोलकर हे महाराष्ट्रातले एक असे प्रमुख कुटुंब. महाराष्ट्राचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास लिहिताना दाभोलकरांची दखल घ्यावीच लागते.
या कुटुंबातील अनेकांशी माझा सहज योग जुळून आला. अगदी अलीकडेपर्यंत या मंडळींचे दर दोन वर्षांनी संमेलन भरत असे; त्यातही एकदा मी थोडा सहभागी झालो होतो. हे कुटुंब एकत्र राहिले याचे श्रेय माई आणि देवदत्त यांच्याइतकेच इतरांनाही आहे.
आपल्या देशात एकत्र कुटुंबे राजकारण, शिक्षण, उद्योग, व्यापार, वैद्यक या क्षेत्रांत बहुसंख्येने आहेत. मात्र प्रत्येक कुटुंब एकाच क्षेत्रात असते. दाभोलकर कुटुंबाचे उलट आहे.
तत्त्वज्ञान, विज्ञान, अर्थशास्त्र, शिक्षण, शेती, वैद्यक, मूलभूत संशोधन, संस्कृती, समाजप्रबोधन आणि परिवर्तनाच्या चळवळी इतक्या विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या दाभोलकर कुटुंबाचे साम्य एकोणिसाव्या शतकामधल्या रवीन्द्रनाथ टागोरांच्या कुटुंबाशीच आहे. त्यामुळे भानू काळे आणि अनिल जोशी यांनी दाभोलकर परिवाराचे विविधरंगी दर्शन घडवणाऱ्या या पुस्तकाचे संपादन करून मराठी साहित्याची श्रीमंती वाढवली आहे.
विनय हर्डीकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 18 जानेवारी 1943 रोजी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त पुण्यात इंग्रजीतून एक भाषण दिलं. ते त्याच वर्षी एप्रिल महिन्यात ‘रानडे, गांधी अँड जीना’ या पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झालं. त्या संपूर्ण पुस्तकाचं हे नवीन मराठी भाषांतर आहे.
या भाषणाच्या शीर्षकात तीन ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची नावं असली तरी, प्रत्यक्षात हे भाषण त्या व्यक्तींपेक्षा डॉ. आंबेडकरांच्या आस्थेचे प्रश्न आणि त्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन साररूपात मांडणारं आहे. म्हणजेच आंबेडकरांच्या विचारविश्वाचा गाभा या भाषणात सापडतो. इतिहासाची जडणघडण आणि त्यामधील मानवी कर्तेपणाचं स्थान, राजकीय आणि सामाजिक लोकशाहीचा विचार, सामाजिक सद्सद्विवेकबुद्धी, श्रेणीबद्ध विषमतेच्या रूपातील जातिव्यवस्था, माध्यमांचा व्यवहार, धर्माचं मानवी जीवनातलं स्थान, या विषयांसोबतच उदारमतवाद, साम्यवाद, समाजवाद, हिंदुत्ववाद इत्यादी विचारसरण्यांबद्दलची आंबेडकरांची मतंही या भाषणातून वाचायला मिळतात.
या भाषणाच्या अनुषंगाने आंबेडकरांच्या विचारव्यवहारातील धागेदोरे जोडून काहीएक आकृती स्पष्ट करण्याचा प्रयत्न सविस्तर विवरणात्मक टिपांमधून केला आहे. आंबेडकरांच्या भाषणात येणाऱ्या विपुल संदर्भाचे स्रोत नोंदवणं, तसंच त्यांनी या भाषणात नोंदवलेल्या मुद्द्याची त्यांच्या इतर विचारव्यवहाराशी कशी सांगड बसते याची उकल करणं, आणि त्यातील वाद-संवादाच्या शक्यतांना सामोरं जाण्याचा प्रयत्न करणं, अशा उद्देशाने या टिपा लिहिल्या आहेत.
1876 ते 1947 असे 70 वर्षांचे आयुष्य धर्मानंद कोसंबी यांना लाभले. त्यांचा जन्म गोव्यात झाला तर मृत्यू सेवाग्राम आश्रमात. वयाच्या ऐन पंचविशीत ते बुद्धी प्रेमाच्या आणि बुद्ध धर्माच्या शोधात घराबाहेर पडले.
पुढील दीड दशकांत त्यांनी पुणे, ग्वाल्हेर, काशी, नेपाळ, गया, मद्रास, श्रीलंका, म्यानमार, कलकत्ता, इंदौर, सिक्कीम, बडोदा, अमेरिका असा प्रवास केला.
ते प्रवास आणि तोपर्यंतचे त्यांचे आत्मकथन म्हणजेच हे निवेदन. कमालीचे वाचनीय आणि थक्क करणारे, अचंबित करणारे.
हे पुस्तक 1924 मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाले.
शंभर वर्षे झाली त्याला. त्या निमित्ताने, आणि त्यांचे 150 वे जयंती वर्ष 9 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाले, त्या निमित्तानेही आणलेली ही नवी आवृत्ती…!
राजकारणाबद्दल सर्वांनाच एक कुतूहल असते. ते सत्तेच्या वापराबद्दल असते हे तर खरेच, पण त्याखेरीज सार्वजनिक व्यवहारांमध्ये येणारे शब्दप्रयोग, त्यांच्या आधारे केले जाणारे युक्तिवाद, यांच्याबद्दलही कुतूहल असते. अनेक वेळा राज्यशास्त्र हा विषय न शिकलेल्या नागरिकांना विविध राजकीय घडामोडींचा अर्थ कसा लावायचा यात रस असतो. म्हणून या पुस्तकात कमीत कमी तांत्रिक आणि विद्याक्षेत्रीय भाषा वापरून सभोवतालच्या राजकारणात वापरले जाणारे शब्द आणि होणारे वादविवाद यांची चर्चा केली आहे. या अर्थाने, हे पुस्तक राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांपेक्षा बिगर-विशेषज्ञ पण चौफेर नजर असलेल्या सुजाण अशा वाचकांसाठी आहे.
स्वातंत्र्य लढ्याची राजकीय पार्श्वभूमी असलेली सव्यसाची ही कादंबरी म्हणजे शरद साहित्याचे सर्वोच्च शिखर आहे. नरहर कुरुंदकरांनी या भव्य कादंबरीचे भरभरून कौतुक केले आहे. कलकत्त्याचे त्या वेळचे पोलीस कमिशनर शरच्चंद्रांना म्हणाले होते, “शरद बाबू, कुठेही आम्ही क्रांतिकारकांना पकडल्यावर त्यांच्याकडे दोन पुस्तकं सापडतात, गीता आणि सव्यसाची. या कादंबरीने क्रांतिकारकांना वेड लावलं आहे.”
क्रांती व स्वातंत्र्याच्या भव्य स्वप्नाने भारावलेला तिचा साहसी नायक सव्यसाची कोणत्या क्रांतिकारकावरून घेतला आहे, याविषयी अनेक तर्क केले जातात.
रासबिहारी बोस, अरविंद घोष, सुभाषचंद्र बोस वगैरेंची नावे येतात. पण यातील कोणी एक नव्हे तर या सर्वांच्या व्यक्तिमत्त्वांची वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये एकत्र झाल्यासारखी वाटतात.
श्रीकांत हे नोबेल विजेता साहित्यिक रोमां रोलांचे अत्यंत आवडते पुस्तक होते. ही एक प्रकारची भ्रमणगाथा आहे आणि हे भ्रमण करताना त्याला दिसलेल्या समाजाचे व जीवनाचे दर्शन श्रीकांत घडवतो. गो. नी. दांडेकरांच्या कुण्या एकाची भ्रमणगाथावर याची दाट छाया जाणवते, पण तिथे श्रीकांतमधले अपूर्व व्यक्तिदर्शन नाही व एवढा विशाल पटही नाही. एक प्रकारे हे शरद बाबूंचे आत्मचरित्र आहे. त्यांची भटकण्याची वृत्ती, ब्रह्मदेशातली नोकरी, विचारसरणी, जातिभेदांविषयी तिरस्कार, पारतंत्र्याचा तिटकारा, सहृदय स्वभाव, पण त्याचबरोबर अन्यायाचा प्रतिकार करण्याचे धारिष्ट, मनातली एक प्रकारची उदासीनता हे सर्व ‘आवारा मसीहा’चे जगणे श्रीकांत आणि शरदबाबू या दोघांच्यात समान दिसते.
श्रीकांत हे नोबेल विजेता साहित्यिक रोमां रोलांचे अत्यंत आवडते पुस्तक होते. ही एक प्रकारची भ्रमणगाथा आहे आणि हे भ्रमण करताना त्याला दिसलेल्या समाजाचे व जीवनाचे दर्शन श्रीकांत घडवतो. गो. नी. दांडेकरांच्या कुण्या एकाची भ्रमणगाथावर याची दाट छाया जाणवते, पण तिथे श्रीकांतमधले अपूर्व व्यक्तिदर्शन नाही व एवढा विशाल पटही नाही. एक प्रकारे हे शरद बाबूंचे आत्मचरित्र आहे. त्यांची भटकण्याची वृत्ती, ब्रह्मदेशातली नोकरी, विचारसरणी, जातिभेदांविषयी तिरस्कार, पारतंत्र्याचा तिटकारा, सहृदय स्वभाव, पण त्याचबरोबर अन्यायाचा प्रतिकार करण्याचे धारिष्ट, मनातली एक प्रकारची उदासीनता हे सर्व ‘आवारा मसीहा’चे जगणे श्रीकांत आणि शरदबाबू या दोघांच्यात समान दिसते.