संकीर्ण

डिकन्स आणि ट्रोलॉप । Dickens and Trolop

70.00

डिकन्स आणि ट्रोलॉप (व्यक्तिचित्रे) – चार्ल्स डिकन्स व ॲन्थनी ट्रोलॉप या दोन ब्रिटिश कादंबरीकारांवर त्यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षांत लिहिलेले दोन दीर्घ लेख.

            

तात्पर्य | Tatparya

40.00
तात्पर्य (कुमारकथा) – युवा साहित्य अकादमी विजेत्या लेखकाने त्याच्या वयाच्या विशीत लिहिलेल्या व साधनात आठ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या नऊ बालकुमार कथा.

           

तीन मुलांचे चार दिवस | Teen Mulanche Chaar Diwas

200.00

डिसेंबर 2015 मध्ये, पुणे शहरात राहणारी तीन मुले (आदर्श पाटील, विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळे) ‘माणूस’ समजून घेण्यासाठी भामरागडच्या पलीकडे, छत्तीसगडच्या परिसरातील दंडकारण्यात – आदिवासींच्या प्रदेशात – सायकल प्रवास करीत गेले. मित्रांनी, ज्येष्ठांनी, कार्यकर्त्यांनी, पोलिसांनीही ‘तो डेंजर झोन आहे’ असे सांगितले असूनही हे तिघे गेले… आणि नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या आदिवासी गावांत/पाड्यांवर त्यांना थांबवून ठेवण्यात आले. चार दिवसांनंतर (पोलिसांचे खबरे नाहीत अशी खात्री पटल्यावर) त्यांना सोडून देण्यात आले.

तोपर्यंत ‘तीन तरुणांचे अपहरण झाल्याच्या बातम्या’ महाराष्ट्रात झळकल्या… आणि त्यांच्या सुटकेसाठी सरकारी पातळीवर प्रयत्न जारी करण्यात आले. त्या तीन तरुणांची ‘त्या’ चार दिवसांची डायरी, त्या सफरीचे मागचे-पुढचे संदर्भ, प्रांजळ आत्मनिवेदन आणि भरपूर रंगीत छायाचित्रांचा समावेश असलेले, आदिवासींच्या जीवनात डोकावणारे अत्यंत वाचनीय पुस्तक.

तीन मुलांचे चार दिवस (अनुभवकथन) – आदिवासी प्रदेशात सायकलयात्रा करत गेलेले तीन तरुण सांगताहेत, नक्षलवाद्यांनी धरून ठेवले त्या चार दिवसांच्या मागचे-पुढचे अनुभव.

            

 

तेजसी | Tejasi

120.00

या संग्रहातील कविता सादर करताना वसंतरावांनी आपल्या समकालीन, समव्यवसायी साहित्यिकांना इशारा देऊन बजावले आहे… “ध्यानात ठेवा, ज्यांची मान ताठ असेल, ज्यांच्या व्यक्तित्वात पोलादाचे उभे-आडवे ताणेबाणे असतील, सत्याचा भार पेलताना ज्यांचा देह झुकला नसेल आणि कोणत्याही लोभासाठी ज्यांनी आत्मा विकला नसेल, त्यांनाच सरस्वतीच्या दरबारात आज आमंत्रण आहे.” आणीबाणीच्या काळात लेखक, कलावंतांची जी मुस्कटदाबी सुरू झाली होती, तिला सच्च्या लेखकाने व कलावंताने शरण जाता कामा नये, असे वसंतरावांना बजावायचे आहे. यात थोडीफार आढ्यता आहे असे कोणाला वाटेल. पण हा कवितासंग्रह वाचल्यानंतर तेवढी आढ्यता, कवीच्या ठिकाणी असायला हरकत नाही असेच वाचकांचे मत होईल.

– ना. ग. गोरे

     

 

 

थर्ड अँगल | Third Angle

70.00
थर्ड अँगल (भाष्यचित्रे) – प्रॅक्टिकल क्लबमध्ये एक थिअरॉटिकल मित्र नियमितपणे येतो आणि प्रॅक्टिकल मित्रांसमोर भाषणे देऊन जातो, त्यातील निवडक 12 भाषणे.

     

थेट सभागृहातून | Thet Sabhagruhatun

240.00
थेट सभागृहातून (भाषणसंग्रह) – मनमोहन सिंग, चिदंबरम, ओबामा, आंग सान सू की ते गोविंद तळवलकर, अरुण टिकेकर, कुमार केतकर अशा 20 नामवंतांनी अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी केलेली व गाजलेली भाषणे.

     

Saleनवी पुस्तके

धार्मिक व सामाजिक सुधारणा | Dharmik Va Samajik Sudharana

360.00

“युरोपीय देशांमध्येसुद्धा लसीकरणाला विरोध करणारे डॉक्टर आहेत, औषधे न घेता शरीर स्वतःहून बरे होईल असे मानणारे ‘शेकर ‘पंथीय लोक आहेत, पृथ्वी सूर्याभोवती फिरते व स्वतःच्या अक्षाभोवतीही फिरते या सत्यापुढे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे पुस्तकपंडित आहेत.

अनेक महान बुद्धिमान व्यक्तींमध्येही विरोधाभासाविषयीचे प्रेम दिसून येते. या दुबळेपणाला ते कवटाळून असतात आणि त्यांच्या इतर कार्यांमधील श्रेष्ठत्व वाढू लागले की, त्यासोबत बांडगुळाप्रमाणे या दुबळेपणाचीही वाढ होत जाते. या अनैसर्गिक घडामोडी बाजूला ठेवल्यावर असे स्पष्ट होते की, प्रत्येक देशात लोकमताला आकार देणारे व एकंदर समुदायाला सजग करणारे बऱ्यापैकी अल्पसंख्याक असतात आणि त्यांच्या मनात वाजवी निर्धार निर्माण करायला वाव आहे. विचार न करणाऱ्या प्रचंड बहुसंख्याकांना यात गणता येणार नाही.”

न्या. महादेव गोविंद रानडे

(सामाजिक प्रश्नांबाबतचे सरकारी कायदे)

    

Saleनवी पुस्तके

न्या. म.गो.रानडे यांचे तीन ग्रंथ | Nya. M. G. Ranade Yanche Tin Granth

1,200.00

1842 ते 1901 असे 60 वर्षांचे आयुष्य न्यायमूर्ती रानडे यांच्या वाट्याला आले. त्यांच्या भाषणांचे व निबंधाचे संग्रह असलेले

1. Essays on Indian Economics.
2. Religious and Social Reforms.
3. Miscellaneous Writings.

हे तीन ग्रंथ 1896 ते 1906 या काळात प्रकाशित झाले होते.

मात्र या तिन्ही ग्रंथांचे अनुवाद मराठीत यापूर्वी कधीच झाले नाहीत.
आता या तिन्हींचे अनुवाद अनुक्रमे

1. भारतीय अर्थकारणावरील निबंध.
2. धार्मिक व सामाजिक सुधारणा.
3. संकीर्ण निबंध.

या तीन शीर्षकांखाली साधना प्रकाशनाकडून आले आहेत. अवधूत डोंगरे यांनी या तिन्ही ग्रंथांचे अनुवाद केले आहेत.
या तीन अनुवादित ग्रंथांना अनुक्रमे नीरज हातेकर, अरविंद गणाचारी व अभय टिळक यांनी विवेचक प्रस्तावना लिहिल्या आहेत.
या लेखनाचे त्या काळातील महत्त्व आणि आजच्या काळातील उपयुक्तता यांचा वेध घेण्याचा प्रयत्न तिन्ही प्रस्तावनाकारांनी केला आहे

1 3 4 5 7