सांस्कृतिक

Saleनवी पुस्तके

Saptahik Sadhana Diwali 2023 | साप्ताहिक साधना दिवाळी 2023

140.00

अनुक्रम

विभाग १

१ ‘श्यामची आई’चे दिग्दर्शन करताना । सुजय डहाके

२ ‘श्यामची आईची पटकथा लिहिताना । सुनील सुकथनकर

३ ‘श्यामची आई’ मध्ये छोटा श्याम साकारताना । शर्व गाडगीळ

 

विभाग २

दोन शास्त्रीय गायकांवर तीन मुलाखती

१ कुमार स्वर एक गंधर्व कथा’ साठी लेखन करताना

– माधुरी पुरंदरे –

२ कुमार स्वर एक गंधर्व कथा साठी चित्रे काढताना

चंद्रमोहन कुलकर्णी

१३ शास्त्रीय गायन हेच क्षेत्रं ठरलं, त्यापूर्वीची मी…

नीला भागवत

 

विभाग ३

दोन मुलाखती। एक शेतकऱ्याची, एक तळेकऱ्याची

१ तलाव संवर्धनाची चळवळ जगभर न्यायची आहे!

• आनंद मल्लीगवाड

२ ‘सह्याद्री फार्म्स’: शेती क्षेत्रातील कोंडी फोडण्याचा एक मार्ग

– विलास शिंदे

 

विभाग ४

संकीर्ण प्रकारातील चार लेख

अवकाशाची दृश्यात्मकता । अमोल पालेकर

घाशीराम व अंताजीची, भेट! | अतुल देऊळगावकर

बालपणीचं पुणं । राजन अन्वर

एक्स्प्रेस पुराण: पहिला अध्याय । विनय हर्डीकर

 

   

Saleनवी पुस्तके

Shastriji | शास्त्रीजी

160.00

‘प्रकांड पंडित’ हे विशेषण विसाव्या शतकातील महाराष्ट्रातील विचारवंतांच्या संदर्भात वापरायचे असेल तर जी काही नावे पटकन समोर येतात, त्यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे नाव हमखास असतेच! २७ जानेवारी १९०१ ते २७ मे १९९४ असे ९३ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. संस्कृत भाषा व साहित्य यातील त्यांची विद्वता विशेष उल्लेखनीय आणि धर्म, संस्कृती, साहित्य, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र इत्यादी विषयांवर त्यांनी केलेले अभ्यास-संशोधन व लेखन पायाभूत मानले जाते.

अशा या शास्त्रीजींच्या साथीत व संगतीत वाई येथे जवळपास दोन दशके वावरलेल्या रा. ग. जाधव यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. शिवाय, रा. ग. जाधव हे मराठीतील नामवंत साहित्य समीक्षक म्हणून ओळखले जातात, त्यामुळे त्यांनी शास्त्रीजींचे कार्य आणि कर्तृत्व ज्या रसिकतेने व विश्लेषक बुद्धीने रेखाटले आहे त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

 

   

Saleनवी पुस्तके

मानवजातीची कथा | Manavjatichi Katha

320.00

या पुस्तकात इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी मांडल्या आहेत. त्या-त्या घडामोडीतील महत्त्वाच्या व्यक्तींभोवती त्या-त्या घडामोडी रंगविल्या आहेत.या जगात स्थूल दृष्टीने दोन प्रकारचे नेते आढळतात : 

संस्कृती व सुधारणा यांना पुढे नेणारे आणि त्यांना मागे खेचणारे. शांतीचे पुरस्कर्ते पहिल्या वर्गात येतात. युद्धे पेटविणारे दुसऱ्या वर्गात येतात. जे मोठमोठे धर्मसंस्थापक होऊन गेले, त्यांनी ‘शांतीनेच खरी प्रगती होते’ या तत्त्वावरील आपली श्रद्धा आपल्या जीवनात उत्कटपणे दाखविलेली आहे. इतिहासाचे नीट निरीक्षण केल्यास आपणास कबूल करावे लागेल, की धर्मसंस्थापकांची ही श्रद्धा यथार्थ आहे. ही श्रद्धा म्हणजे केवळ धर्मग्रंथांतील आशावाद नव्हे; ही श्रद्धा स्वतः सिद्ध असे इतिहासातील एक सत्य आहे.

‘शांतीचे दूतच पृथ्वीचे वारसदार होतील’ हा दृष्टिकोन ‘मानवजातीची कथा ‘ हे पुस्तक लिहिताना डोळ्यांसमोर आहे.

     

शिंग फुंकिले रणी | Shing Funkile Rani

120.00

जिथे जिथे
भारतावर प्रेम करणाऱ्या
माझ्या बंधुभगिनींचे
समुदाय जमतात
तिथे तिथे ही गाणी
खुशाल कोणीही म्हणावीत…

     

 

1 2