सामाजिक

गांधींविषयी (खंड 1)-जीवन व कार्य | Gandhinvishyi (Khand 1)-Jeevan va Karya

480.00

गेल्या शंभर वर्षातील मराठी भाषेमधील गांधींविषयक गंभीर वैचारिक साहित्यातून आजच्या काळाच्या संदर्भात महत्त्वाचे ठरणारे लेख या प्रकल्पासाठी निवडले.हे अतिशय महत्त्वाचे आणि भावी काळाचा वेध घेणारे चिंतन आहे. समाजाविषयी आस्था बाळगणाऱ्या सर्वांसाठी पुढील काही दशके उपयुक्त ठरू शकेल असा हा त्रिखंडात्मक ग्रंथरूपी खजिना आहे.

‘गांधीः व्यक्ती आणि विचार’ या पहिल्या खंडात टिळक-टागोर ते आजच्या काळातील चैत्रा रेडकर या पाच पिढ्यांतील विचारवंत आणि अभ्यासकांनी गांधीजींचे व्यक्तित्व आणि विचार यांचे फक्त आकलन मांडलेले नाही, तर गांधी विचारांची त्यांच्या त्यांच्या कालखंडातील प्रस्तुतताही अधोरेखित केली आहे.

 

 

परिवर्तनाचे दोन पाईक | Pariwartnache Don Paik

60.00

आजच्या विषयाचे मी दोन विभाग पाडणार आहे. विषयाची मांडणी मी अशी करू इच्छितो की, ज्या महत्त्वाच्या संकल्पना आमच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनामध्ये आहेत, त्या प्रत्येक संकल्पनेबद्दल न्या. रानड्यांचे विचार आणि फुल्यांचे विचार यांचा तौलनिक दृष्टीने परामर्श पहिल्या व्याख्यानात घ्यावा. आणि दुसऱ्या दिवशी आजच्या सामाजिक समस्यांच्या संदर्भात न्या. रानडे आणि जोतिबा फुले यांची संबद्धता काय आहे हे तपासून पाहावे. जोतिबा फुले आणि न्या. रानडे यांच्या विचारांची वर्तुळे काही ठिकाणी एकमेकांना स्पर्श करतात, तर काही ठिकाणी एकमेकांना छेद देतात. माझ्या व्याख्यानांमध्ये हे स्पर्शबिंदू आणि छेदबिंदू या दोहोंचाही मी विचार करणार आहे.

 

     

वेध अंतर्वेध | Vedh Antarvedh

240.00
प्रतिभावान लेखकांची नानाविध रंगांची उधळण करणारी आणि सुगंध दरवळणारी तजेलदार साहित्यसुमने माझ्या परडीत नाहीत. या लेखसंग्रहात आहेत त्या फक्त सामाजिक, राजकीय, आर्थिक, संसदीय, तत्त्वज्ञानविषयक, भारतीय घटनासंबंधित आणि वैज्ञानिक समस्यांची मीमांसा करणाऱ्या लेखांच्या शुष्क समिधा! या पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात राजकारण, समाजकारण, अर्थशास्त्र, विज्ञानशास्त्र, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रांतील परिवर्तनाच्या आणि उपक्रमशीलतेच्या प्रक्रियेत मोठा सहभाग असलेल्या व्यक्तिमत्त्वांचा वेध घेतलेला आढळेल, तर दुसऱ्या भागात विविध वैचारिक समस्यांबाबतच्या माझ्या अंतर्वेधाचे प्रतिबिंब उमटलेले दिसेल. गेली अनेक वर्षे मी केलेले लिखाण म्हणजे निरनिराळ्या क्षेत्रांत निर्माण झालेल्या नव्या नव्या वैचारिक आव्हानांना दिलेला प्रतिसाद आहे. या वास्तवाचा प्रत्यय वाचकांना प्रस्तुत लेखसंग्रहात येईल.

 

   

Rashtriya Ekatmata aani Bharatiya Musalman | राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान

240.00
हमीद दलवाई यांच्या मते- मुस्लीम मन हे कुराण, हदीस, पैगंबरांचे जीवन व इस्लामिक परंपरा यांच्या आधारेच बनते. सनातनी व मूलतत्त्ववादी हे इस्लाममध्ये पूर्ण धर्म व परिपूर्ण समाज आहे, असे मानतात. त्यांच्या दृष्टीने पैगंबरसाहेबांनी जो प्रयोग केला, त्याचे फक्त अनुकरण करणे व कोठल्याही परिस्थितीत चिकित्सा न करणे, हे आपले काम आहे. या भूमिकेतूनच जे मुस्लीम मन बनते, ते धर्मसुधारणेस व समाज-प्रबोधनास कसे तयार होणार?
भाई वैद्य (प्रस्तावनेतून)

     

Purnasatya | पूर्णसत्य

240.00
पूर्णसत्य (आत्मकथन) – ललित लेखकाचे व निवृत्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याचे हे पुस्तक म्हणजे गुजराती भाषेतील पहिले दलित आत्मकथन.

     

मंच | Manch

200.00
मराठी ख्रिस्ती समाजातील अनुभवविश्वाचं व विचारांचं सुबोध ललित शैलीत प्रत्ययकारी चित्रण करणारं हे पुस्तक.या पुस्तकाच्या केंद्रस्थानी ख्रिस्ती धर्म आणि विवेकवाद या संदर्भातील चर्चा आहे.

     

सा. रे. पाटील बोलतोय | Sa. Re. Patil Boltoy

120.00

सा. रे. पाटील बोलतोय (आत्मकथन) – दक्षिण महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील एका आदरणीय व कर्तृत्ववान व्यक्तीने, आदर्शाचा पाठपुरावा करीत केलेल्या रचनात्मक कार्याच्या आठवणी.

(शब्दांकन – किशोर रक्ताटे)

     

1 9 10 11