पुस्तक संच

Saleनवी पुस्तके

न्या. म.गो.रानडे यांचे तीन ग्रंथ | Nya. M. G. Ranade Yanche Tin Granth

1,200.00

1842 ते 1901 असे 60 वर्षांचे आयुष्य न्यायमूर्ती रानडे यांच्या वाट्याला आले. त्यांच्या भाषणांचे व निबंधाचे संग्रह असलेले

1. Essays on Indian Economics.
2. Religious and Social Reforms.
3. Miscellaneous Writings.

हे तीन ग्रंथ 1896 ते 1906 या काळात प्रकाशित झाले होते.

मात्र या तिन्ही ग्रंथांचे अनुवाद मराठीत यापूर्वी कधीच झाले नाहीत.
आता या तिन्हींचे अनुवाद अनुक्रमे

1. भारतीय अर्थकारणावरील निबंध.
2. धार्मिक व सामाजिक सुधारणा.
3. संकीर्ण निबंध.

या तीन शीर्षकांखाली साधना प्रकाशनाकडून आले आहेत. अवधूत डोंगरे यांनी या तिन्ही ग्रंथांचे अनुवाद केले आहेत.
या तीन अनुवादित ग्रंथांना अनुक्रमे नीरज हातेकर, अरविंद गणाचारी व अभय टिळक यांनी विवेचक प्रस्तावना लिहिल्या आहेत.
या लेखनाचे त्या काळातील महत्त्व आणि आजच्या काळातील उपयुक्तता यांचा वेध घेण्याचा प्रयत्न तिन्ही प्रस्तावनाकारांनी केला आहे

हमीद दलवाईंंची पुस्तके| Hamid Dalawainchi pustake

760.00

इस्लामचे भारतीय चित्र

कानोसा : भारतातील मुस्लीम मनाचा

भारतातील मुस्लीम राजकारण

अँँग्री यंग सेक्युलॅॅरीस्ट

राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान

जमिला जावद आणि इतर कथा

 

Nivadak Sadhana Granthasanch – Khand 1 Te 8 | निवडक साधना ग्रंथसंच – खंड 1 ते 8

1,920.00

15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाचे हीरकमहोत्सवी वर्ष आले तेव्हा, तोपर्यंतच्या सहा दशकांतील जवळपास तीन हजार अंकांमधून 205 लेख निवडले होते. त्या लेखांचे वर्गीकरण आशय व विषय यानुसार करून आठ खंड प्रकाशित केले होते. विविध क्षेत्रांतील 120 व्यक्तींनी लिहिलेले ते लेख आहेत. 2007 मध्ये प्रकाशित झालेल्या या ग्रंथसंचाची नवी आवृत्ती साधनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात आणली आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील राजकीय-सामाजिक जीवनात डोकावण्यासाठी हा संच विशेष उपयुक्त आहे.

       

 

गांधींविषयी | Gandhinvishayi

1,200.00

 

गेल्या शंभर वर्षांतील मराठी भाषेमधील गांधींविषयक गंभीर वैचारिक साहित्यातून आजच्या काळाच्या संदर्भात महत्त्वाचे ठरणारे लेख या प्रकल्पासाठी निवडले. हे अतिशय महत्त्वाचे आणि भावी काळाचा वेध घेणारे चिंतन आहे. समाजाविषयी आस्था बाळगणाऱ्या सर्वांसाठी पुढील काही दशके उपयुक्त ठरू शकेल असा हा त्रिखंडात्मक ग्रंथरूपी खजिना आहे.

खंड 1 (एकूण पृष्ठे – 544) – ‘गांधी : व्यक्ती आणि विचार’ या पहिल्या खंडात टिळक-टागोर ते आजच्या काळातील चैत्रा रेडकर या पाच पिढ्यांतील विचारवंत आणि अभ्यासकांनी गांधीजींचे व्यक्तित्व आणि विचार यांचे फक्त आकलन मांडलेले नाही तर गांधी विचारांची त्यांच्या त्यांच्या कालखंडातील प्रस्तुतताही अधोरेखित केली आहे.

खंड 2 (एकूण पृष्ठे – 420) – ‘गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व’ या दुसऱ्या खंडामध्ये सॉक्रेटिस-टागोरांपासून ते आंबेडकर-लोहियांपर्यंत एका विशिष्ट विचारवंतांच्या विचारांच्या संदर्भात गांधी विचारांची चर्चा केली असल्याने गांधी विचारांच्या आकलनास एक व्यापक अशी संदर्भचौकट प्राप्त झाली आहे. यातूनच आपल्याला आजच्या समस्या समजून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी दिशा प्राप्त होणार आहे.

खंड 3 (एकूण पृष्ठे – 300) – ‘गांधी : खुर्द आणि बुद्रुक’ या तिसऱ्या खंडात भाषा, विज्ञान, जीवनशैली यांसारख्या गांधीजींच्या जीवनातील विविध विषयांना स्पर्श केला आहे. गांधी विचारांच्या परिपूर्ण आकलनासाठी या वेगवेगळ्या विषयांतून भेटणारे गांधी महत्त्वाचे आहेत. जणू काही कॅलिडोस्कोपमधील अनेक पैलूंतून निर्माण होणारी सुघड आकृती. म्हणूनच येथे अनेक खुर्दमधून आपल्याला आकळतात बुद्रुक गांधी.

दर्जेदार निर्मिती व हार्डबाउंड अशा तिन्ही खंडांची एकूण किंमत 1500 रुपये.
सवलतीत 1200 रुपये.

 

     

 

Saleनवी पुस्तके

श्रीकांत भाग 3 व 4 | Shrikant Bhag 3 & 4

320.00

‘श्रीकांत’ हे नोबेल विजेता साहित्यिक रोमां रोलांचे अत्यंत आवडते पुस्तक होते. ही एक प्रकारची भ्रमणगाथा आहे आणि हे भ्रमण करताना त्याला दिसलेल्या समाजाचे व जीवनाचे दर्शन श्रीकांत घडवतो. गो. नी. दांडेकरांच्या कुण्या एकाची भ्रमणगाथावर याची दाट छाया जाणवते, पण तिथे श्रीकांतमधले अपूर्व व्यक्तिदर्शन नाही व एवढा विशाल पटही नाही. एक प्रकारे हे शरद बाबूंचे आत्मचरित्र आहे. त्यांची भटकण्याची वृत्ती, ब्रह्मदेशातली नोकरी, विचारसरणी, जातिभेदांविषयी तिरस्कार, पारतंत्र्याचा तिटकारा, सहृदय स्वभाव, पण त्याचबरोबर अन्यायाचा प्रतिकार करण्याचे धारिष्ट, मनातली एक प्रकारची उदासीनता हे सर्व ‘आवारा मसीहा’चे जगणे श्रीकांत आणि शरदबाबू या दोघांच्यात समान दिसते.

Saleनवी पुस्तके

श्रीकांत भाग 1 व 2 | Shrikant Bhag 1 & 2

280.00

‘श्रीकांत’ हे नोबेल विजेता साहित्यिक रोमां रोलांचे अत्यंत आवडते पुस्तक होते. ही एक प्रकारची भ्रमणगाथा आहे आणि हे भ्रमण करताना त्याला दिसलेल्या समाजाचे व जीवनाचे दर्शन श्रीकांत घडवतो. गो. नी. दांडेकरांच्या कुण्या एकाची भ्रमणगाथावर याची दाट छाया जाणवते, पण तिथे श्रीकांतमधले अपूर्व व्यक्तिदर्शन नाही व एवढा विशाल पटही नाही. एक प्रकारे हे शरद बाबूंचे आत्मचरित्र आहे. त्यांची भटकण्याची वृत्ती, ब्रह्मदेशातली नोकरी, विचारसरणी, जातिभेदांविषयी तिरस्कार, पारतंत्र्याचा तिटकारा, सहृदय स्वभाव, पण त्याचबरोबर अन्यायाचा प्रतिकार करण्याचे धारिष्ट, मनातली एक प्रकारची उदासीनता हे सर्व ‘आवारा मसीहा’चे जगणे श्रीकांत आणि शरदबाबू या दोघांच्यात समान दिसते.

जनता पक्षाचा प्रयोग – खंड 1 ते 4 | Janata Pakshacha Prayog – Khand 1 te 4

1,200.00

1 मे 1922 ते 8 जानेवारी 1995 असे 72 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या मधु लिमये यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच संपले आहे. भारतातील समाजवादी चळवळीतील पहिल्या पिढीचे प्रमुख नेते व विचारवंत अशी त्यांची ओळख राहिली आहे. त्यांची मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये मिळून लहान-मोठी अशी तीन डझन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी 1994 मध्ये ‘Janata Party Experiment’ या शीर्षकाखाली इंग्रजीत 1200 पानांचा द्विखंडात्मक ग्रंथ लिहिला होता. तो बृहद् ग्रंथ मराठीत प्रथमच प्रकाशित होत आहे. वाचकांच्या सोयीसाठी मराठी अनुवाद चार खंडांत येत आहे. खंड 1 व 2 चे अनुवाद वासंती फडके यांनी, तर खंड 3 व 4 चे अनुवाद सुनिती जैन यांनी केले आहेत. मराठीतील प्रत्येक खंड तीनशे ते साडेतीनशे पाने यादरम्यान असून, प्रत्येक खंडाची किंमत 350 रुपये आहे. या अनुवादित ग्रंथाचे संपादन अमरेंद्र धनेश्वर व अनिरुद्ध लिमये यांनी केले आहे. 1975 ते 1980 या काळातील अत्यंत स्फोटक असे भारताचे अंतर्गत राजकारण आणि अखेर सत्तांतर यांचे अधिक चांगले आकलन करून घेण्यासाठी हे चार खंड वाचायला हवेत, संग्रही ठेवायला हवेत!

 

       

 

1 2