संकीर्ण

ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर | Dnyanmurti Govind Talwarkar

280.00

जेष्ठ पत्रकार – संपादक गोविंदराव तळवलकर यांचे व्यक्तित्व, त्यांचे वाचन, लेखन, संपादन आणि त्यांना असलेली बागकामाची व पशुपक्ष्यांची आवड यांविषयी त्यांच्या मुलींनी लिहिलेले पुस्तक.

     

वाचता वाचता । Vachata Vachata

280.00

गोविंदराव तळवळकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये ‘वाचता वाचता’ हा स्तंभ ‘वाचस्पती’ या टोपणनावाने लिहिला, तो नंतर प्रेस्टीज प्रकाशनाकडून पुस्तकरूपाने 1979 मध्ये आला होता. त्या पुस्तकाची नवी आवृत्ती साधनाकडून हार्डबाऊंडमध्ये.

            

Bahuayami Ramesh Shipurkar : Manus aani Karyakarta | बहुआयामी रमेश शिपूरकर : माणूस आणि कार्यकर्ता

280.00

रमेश शिपूरकर पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा या भागात समाजपरिवर्तनाच्या अनेक चळवळींमधे सहभागी असलेलं एक नाव. रमेशचा मृत्यू 1995 मध्ये झाला. तरी आजही अनेकांच्या स्मृतीत हे नाव घट्ट रुजलेलं आहे. 25 वर्षांच्या कालावधीनंतर त्यांच्या पत्नी शोभना शिपूरकर यांनी केलेलं हे लिखाण.

       

 

Laurie Baker – Nisargasanvadi Abhijat Vastukala । लॉरी बेकर – निसर्गसंवादी अभिजात वास्तुकला

280.00

हरित इमारत, पर्यावरणपूरक वास्तू, भूकंपरोधक घरे, सर्जनशील निवास, नगररचना वास्तुकलेतील कोणत्याही प्रांतात नव्याने काही घडत असेल तर त्यावर बेकर यांचा प्रभाव अटळ आहे. पौर्वात्य व पाश्चात्त्य विचार, नवता व परंपरा, बुद्धी व भावना, निसर्ग व माणूस, आशय व घाट यांत अद्वैत साधून आधुनिकता व सुसंस्कृतता रुजवणारी बेकर यांची ही सर्जनशील यात्रा 59 वर्षे अथक होती.

     

पोशिंद्याचे आख्यान | Poshindyache Aakhyan

280.00

शेतीचा प्रश्न हा प्रामुख्याने राजकीय आहे. तसेच तो फक्त शेतकऱ्यांच्या जीवन-मरणापुरताच मर्यादित नाही, याची जाणीव शेती उत्पादनावर जगणाऱ्या प्रत्येक समाजघटकाला व्हावी लागेल. जगाच्या इतिहासात अशा जाणिवेचे दाखले मोजकेच आहेत; आणि वर्तमान तर निराशाजनक आहे. त्यामुळे शोषणाच्या या दुष्टचक्रात भरडून निघण्याची वेळ प्रत्येकावर येणे निश्चित आहे. शेतकरी जात्यात आहे. तर शहरं सुपात. शेतीच्या गंभीर प्रश्नाचे वास्तव समजून घेतले तर कदाचित ती वेळ टळेल!

अशा परिस्थितीत ग्रामीण भवतालाची जाण असलेला, शेतकरी व शेती यांच्याबद्दल डोळस आस्था असलेला आणि अभ्यास करून लिहिणारा पत्रकार, शेतीच्या उपभोक्तावर्गाला आणि शेतकऱ्यांना महत्त्वाचे इनपुट्स देऊ शकतो. रमेश जाधव या तरुण पत्रकाराच्या अशा लेखांचा हा संग्रह आहे.

गेल्या पाच वर्षांतील शेतीप्रश्नाचे वास्तव या लेखांतून मांडले आहे. सत्तेवर येण्यापूर्वीची आश्वासने आणि निवडून आल्यानंतर सरकारची प्रत्यक्ष कृती यातील तफावत, अनेक बाजूंनी तपासून पाहिली आहे. थेट शेतीविषयक घटनांशिवाय मराठा आरक्षण, अण्णा हजारेंचे आंदोलन, गोवंशहत्याबंदी इत्यादी घडामोडींवर चर्चा करताना मूळ विषयाचा विस्तृत पट उभा राहतो. आकडेवारी आणि तांत्रिक तपशिलांसह लेखकाने घेतलेल्या रोखठोक भूमिकांमुळे मांडणीत नेमकेपणा आला आहे. भाषेतील संयमित उपरोधातून लेखकाची साहित्याची जाण दिसून येते. तात्कालिक घटनांच्या संदर्भातून शेतीच्या मूलभूत समस्यांची ललित भाषाशैलीने पुनर्मांडणी करणारा हा दस्तऐवज आहे.

– विनय हर्डीकर

     

 

कॅप्टन लक्ष्मी आणि राणी झांशी रेजिमेंट | Captain Laxmi Aani Rani Jhansi Regiment

280.00
राणी झांशी रेजिमेंटची उभारणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कशी केली, त्याची रोमहर्षक कहाणी.

     

Saleनवी पुस्तके

पत्र-पाथेय | Patra-Patheya

320.00

भूदान-ग्रामदान आंदोलन काळात विनोबांनी हजारो व्याख्याने दिली, चर्चा केल्या. त्यांनी अनेक पत्रेही लिहिली. आंदोलनाच्या प्रणेत्याचे-नेत्याचे मानस तर या पत्रांमधून प्रकट झालेले आहेच; या पत्रांमध्ये रणनीती, कार्यक्रम, कार्यशैली वगैरेंबाबतचे विचार आहेत. कार्यकर्त्यांशी व्यक्तिगत पातळीवर संवादही आहे. पत्रांमधून बरेचदा अशी सामग्री सापडते, जी मुद्रित दस्तऐवजांमध्ये नसते. लेख व भाषणे यांचे स्वतःचे महत्त्व असते. त्यांच्यात एखाद्या विषयाची मुद्देसूद मांडणी असते. पत्रांमध्ये हृद्गत प्रकट झालेले असते, अंतरीचा जिव्हाळा प्रकट झालेला असतो. पत्रलेखकाच्या आणि पत्र-प्राप्तकर्त्याच्याही स्वभावाच्या विविध पैलूंवर त्यांतून प्रकाश पडतो. म्हणूनच विनोबांची पत्रे हा भूदान-ग्रामदान आंदोलनाच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. तो वाचकांसमोर येण्याने भूदान-ग्रामदानविषयक विमर्शात मोलाची भर पडणार आहे.

Saleनवी पुस्तके

भारतीय अर्थकारणावरील निबंध | Bhartiya Arthkarnavaril Nibandh

360.00

“स्थानिक सत्तेचे सर्वांत कनिष्ठ एकक विचारात घ्यायचे झाले तर भारतातील ग्रामसमुदायाइतक्या स्वयंपूर्ण व स्वावलंबी एककासारखा कोणताच दाखला युरोपातील कोणत्याही देशात सापडत नाही. रशियातील ‘मीअ’ (Mere), जर्मनीमधील ‘गाउ’ (Gau), फ्रान्समधील ‘कमिन’ (Commune), इंग्लंडमधील ‘पॅरिश’ (Parish) यांचा उगम भारतीय गावाशी मिळताजुळता असला तरी, जुन्या काळी भारतीय ग्रामसमुदाय पूर्ण स्वातंत्र्य बाळगून होता, तसे मात्र या इतर देशांमधील रचनांबाबत म्हणता येत नाही. पण, भारतातील लोकांनी सभ्य व सामुदायिक जीवनाचा पुढील विकास मात्र साधला नाही.

जुन्या ग्रीक व रोमन समुदायांनी अनुक्रमे ‘सिव्हिटास’ व ‘डेमॉस’ या रचना परिपूर्णरीत्या विकसित केल्या. इटलीतील काही शहरे, जर्मनीतील काही स्वतंत्र शहरे, नेदरलँड्स व स्वित्झर्लंड आणि युरोपीय इतिहासातील सर्वोत्तम काळाचा अपवाद वगळता ग्रीक व रोमन समुदायांच्या रचनांच्या तोडीची कामगिरी इतरांना फारशी करता आली नाही.”

– न्या. महादेव गोविंद रानडे (इंग्लंड व भारत येथील स्थानिक शासन)

 

   

1 5 6 7