साहित्य

दलपतसिंग येती गावा (नाट्यनिर्मिती प्रक्रिया) | Dalpatsingh Yeti Gava (Natyanirmiti Prakriya)

100.00

या पुस्तकात ‘दलपतसिंग येती गावा’ या नाटकाविषयी फार थोडे बोलले गेले आहे, बहुतेक सर्व जण सांगत आहेत ते या नाटकाच्या निर्मितिप्रक्रियेविषयी. अरुणा रॉय यांनी राजस्थानातील देवडुंगरी या खेड्यातील मजूर-शेतकऱ्यांना घेऊन तिथल्या स्थानिक प्रस्थापितांच्या (राजकारणी, जमीनदार, प्रशासकीय अधिकारी) विरोधात दिलेला लढा आणि त्यातून उगम पावलेला माहितीच्या अधिकाराचा कायदा याची गोष्ट म्हणजे हे नाटक आहे. आणि अतुल पेठे यांनी जांबसमर्थ या गावात सात-आठ महिने तंबू ठोकून, तिथल्या लोकांना हाताशी धरून माहितीच्या अधिकारावरील जे नाटक उभे केले, त्याची हकिगत म्हणजे हे पुस्तक आहे.

     

रुग्णानुबंध | Rugnanubandha

160.00

रुग्णानुबंध (व्यक्तिचित्रे) – एका संवेदनशील फॅमिली डॉक्टरला प्रॅक्टिस करताना दिसलेले अस्वस्थ समाजचित्र.

     

मी भरून पावले आहे । Mi Bharun Pavale Aahe

200.00

मी भरून पावले आहे (आत्मचरित्र) – साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी त्यांच्या दोन दशकांतील सहजीवनाचे केलेले प्रांजळ आत्मनिवेदन.

     

Shyamchi Aai | श्यामची आई

160.00

अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य आपल्या मराठी भाषेत आहे असे ज्ञानेश्वर म्हणाले, पण वाटेल त्यांच्या मुखातून किंवा लेखणीतून निघालेली मराठी भाषा अमृताशी थोडीच पैजा जिंकू शकणार आहे? ते सामर्थ्य जसे ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’मध्ये आहे, तसे गुरुजींच्या ‘श्यामची आई’ मध्येही आहे.

-आचार्य अत्रे

     

श्यामचा जीवनविकास । Shyamcha Jivanvikas

120.00

‘श्यामचा जीवनविकास’ या पुस्तकात मॕट्रिकचे वर्ष आणि महाविद्यालयीन शिक्षणाची तीन वर्ष हा वय वर्ष 19 ते 22 हा कालखंड आला आहे. पण हा कालखंड पूर्ण आणि विस्ताराने येत नाही.
पुणे येथे शिक्षणासाठी गुरुजींनी सोसलेले कष्ट, मृदू, सोशिक आणि संकोची गुरुजींचे अनुभव, त्यांचे भावविश्व व विचारविश्व हे सर्व यामधे आले आहे.

            

धडपडणारा श्याम । Dhadpadnara Shyam

160.00

‘धडपडणारा श्याम’ मध्ये दापोलीहून शिक्षणासाठी औंधला जाणे, सहा महिन्यांनी औंध सोडून पुण्यात येऊन मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण हा वय वर्षे 15 ते 18 हा कालखंड आला आहे. औंध आणि पुणे येथे शिक्षणासाठी गुरुजींनी सोसलेले कष्ट, मृदू, सोशिक आणि संकोची गुरुजींचे अनुभव, त्यांचे भावविश्व व विचारविश्व हे सर्व यामधे आले आहे.

            

श्याम | Shyam

180.00

24 डिसेंबर 1899 ते 11 जून 1950 असे जेमतेम पन्नास वर्षांचे आयुष्य साने गुरुजींना मिळाले. त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा 22 वर्षांचा कालखंड कोणी लिहिलेला नाही. त्यासाठीच त्यांनी स्वतःच लिहिलेली चार पुस्तके हाच काय तो मुख्य दस्तऐवज. श्यामची आई, श्याम, धडपडणारा श्याम, श्यामचा जीवन विकास याच त्या चार आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या. श्यामची आई मध्ये गुरुजींनी आपल्या आईला केंद्रस्थानी ठेवून बालपण मांडले आहे, त्यात नंतरचा काळही थोडा येऊन जातो. ‘श्याम’ या पुस्तकात पाचवीसाठी पुण्यात मामाकडे येणे, सहा महिन्यानंतर पुणे सोडून दापोलीत चार वर्षे आतेकडे राहून शिक्षण घेणे हा कालखंड आला आहे. शालेय वयातील श्यामचे भावविश्व, विचारविश्व, श्यामचे अनुभव आणि त्यावरील श्यामचे चिंतन  ‘श्याम’ मधे आले आहे.

            

Saleनवी पुस्तके

आत्मकथा | Aatmakatha

560.00

1922 ते 1995 असे जवळपास 73 वर्षांचे आयुष्य मधु लिमये यांना लाभले. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला आणि 1982 पर्यंत ते सक्रिय राजकारणात राहिले. ‘चले जाव’ चळवळ, ‘गोवा मुक्ती संग्राम’ आणि ‘राष्ट्रीय आणीबाणी’ या तिन्ही प्रसंगी त्यांनी तुरुंगवास भोगला. समाजवादी पक्षाचे नेते म्हणून ते तरुणपणापासून वावरले. महाराष्ट्रातच जडणघडण झालेली असूनही बिहारमधून चार वेळा लोकसभेवर निवडून गेले, उत्तम संसदपटू अशी त्यांची ख्याती राहिली. अखेरची 12 वर्षे त्यांनी राजकारणाचे भाष्यकार आणि लेखक या भूमिका पार पाडल्या. त्यांच्या नावावर लहान-मोठी अशी चार डझन (हिंदी व इंग्रजी) पुस्तके आहेत.
अशा या मधु लिमये यांनी वयाच्या पंचविशीपर्यंतचे म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाले तोपर्यंतचे लिहिलेले आत्मकथन म्हणजे हे पुस्तक आहे.
यातून त्यांची बालकुमार वयातील व तारुण्यातील झंझावाती वाटचाल तर दिसतेच, पण स्वातंत्र्यपूर्व पाव शतकातील भारतीय समाजजीवनाची विहंगम दृश्येही पाहायला मिळतात. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर चार दशकांतील त्यांची तेजस्वी वाटचाल आणि भारताचे वादळी राजकारण समजून घेण्यासाठी हे पुस्तक पायाभूत ठरेल.

1 7 8 9