साहित्य

कैफियत | Kaifiyat

160.00
कैफियत (लेखसंग्रह) – माणूस, प्राणी, पक्षी आणि एकूणच निसर्गाची कैफियत मांडणारे आणि सभोवतालाकडे सजगतेने पाहायला शिकवणारे ललित लेख.

     

माझे विद्यार्थी | Majhe Vidhyarthi

140.00
माझे विद्यार्थी (व्यक्तिचित्रे) – एका प्राथमिक शिक्षकाला त्याच्या कारकिर्दीत भेटलेली काही अफलातून यशस्वी व अयशस्वी मुले-मुली.

         

भारतीय भाषा आणि साहित्य | Bhartiya Bhasha Ani Sahitya

200.00
भारतीय भाषा आणि साहित्य (लेखसंग्रह) – भारतीय संविधानाने 22 भाषांना ‘राजभाषा’ अशी मान्यता दिली आहे. त्या सर्व भाषा आणि त्यांतील साहित्य यांचा परिचय करून देणाऱ्या लेखांचा संग्रह.

     

दलपतसिंग येती गावा (नाट्यनिर्मिती प्रक्रिया) | Dalpatsingh Yeti Gava (Natyanirmiti Prakriya)

100.00

या पुस्तकात ‘दलपतसिंग येती गावा’ या नाटकाविषयी फार थोडे बोलले गेले आहे, बहुतेक सर्व जण सांगत आहेत ते या नाटकाच्या निर्मितिप्रक्रियेविषयी. अरुणा रॉय यांनी राजस्थानातील देवडुंगरी या खेड्यातील मजूर-शेतकऱ्यांना घेऊन तिथल्या स्थानिक प्रस्थापितांच्या (राजकारणी, जमीनदार, प्रशासकीय अधिकारी) विरोधात दिलेला लढा आणि त्यातून उगम पावलेला माहितीच्या अधिकाराचा कायदा याची गोष्ट म्हणजे हे नाटक आहे. आणि अतुल पेठे यांनी जांबसमर्थ या गावात सात-आठ महिने तंबू ठोकून, तिथल्या लोकांना हाताशी धरून माहितीच्या अधिकारावरील जे नाटक उभे केले, त्याची हकिगत म्हणजे हे पुस्तक आहे.

     

रुग्णानुबंध | Rugnanubandha

160.00

रुग्णानुबंध (व्यक्तिचित्रे) – एका संवेदनशील फॅमिली डॉक्टरला प्रॅक्टिस करताना दिसलेले अस्वस्थ समाजचित्र.

     

मी भरून पावले आहे । Mi Bharun Pavale Aahe

200.00

मी भरून पावले आहे (आत्मचरित्र) – साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी त्यांच्या दोन दशकांतील सहजीवनाचे केलेले प्रांजळ आत्मनिवेदन.

     

Shyamchi Aai | श्यामची आई

160.00

अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य आपल्या मराठी भाषेत आहे असे ज्ञानेश्वर म्हणाले, पण वाटेल त्यांच्या मुखातून किंवा लेखणीतून निघालेली मराठी भाषा अमृताशी थोडीच पैजा जिंकू शकणार आहे? ते सामर्थ्य जसे ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’मध्ये आहे, तसे गुरुजींच्या ‘श्यामची आई’ मध्येही आहे.

-आचार्य अत्रे

     

श्यामचा जीवनविकास । Shyamcha Jivanvikas

120.00

‘श्यामचा जीवनविकास’ या पुस्तकात मॕट्रिकचे वर्ष आणि महाविद्यालयीन शिक्षणाची तीन वर्ष हा वय वर्ष 19 ते 22 हा कालखंड आला आहे. पण हा कालखंड पूर्ण आणि विस्ताराने येत नाही.
पुणे येथे शिक्षणासाठी गुरुजींनी सोसलेले कष्ट, मृदू, सोशिक आणि संकोची गुरुजींचे अनुभव, त्यांचे भावविश्व व विचारविश्व हे सर्व यामधे आले आहे.

            

1 7 8 9