1922 ते 71 असे जेमतेम 48 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या बॅ.नाथ पै यांचे जीवन म्हणजे अकाली विझलेला एक झंझावात होता. कोकणात जन्माला आलेला हा माणूस तारुण्याच्या उंरबठ्यावर असताना 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनात उडी घेतो, स्वातंत्र्यानंतर बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला जातो, 1952 ची निवडणूक बेळगावमधून लढवण्यासाठी भारतात परत येतो, त्या निवडणुकीत पराभव झाल्यावर उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी परत इंग्लंडला जातो. बॅरिस्टर होऊन ऑस्ट्रियन मुलीशी विवाह करून भारतात येतो आणि 1957, 62 व 67 या तिन्ही निवडणुका कोकणातील राजापूर मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या वतीने जिंकतो, लोकसभेत उत्तम संसदपटू म्हणून काम करताना देशाचे लक्ष वेधतो आणि वयाची पन्नाशी गाठायच्या आत हे जग सोडून जातो. अशा या झंझावाताचे त्याच्या जवळच्या मित्राने व सहकाऱ्याने रेखाटलेले हे चरित्र आहे.
Sale
₹250.00 ₹200.00
₹200.00 ₹160.00
₹250.00 ₹200.00
₹300.00 ₹240.00
₹175.00 ₹140.00
₹250.00 ₹200.00
Lokshahicha Kaivari | लोकशाहीचा कैवारी
लोकशाहीचा कैवारी (चरित्र) – उत्कृष्ठ संसदपटू व समाजवादी नेते अशी ओळख असलेल्या बॅरिस्टर नाथ पै यांचे राजकीय, सामाजिक जीवन त्यांच्या मित्राने रेखाटले आहे.
Weight | 0.25 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1.5 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 194 |
Be the first to review “Lokshahicha Kaivari | लोकशाहीचा कैवारी” Cancel reply
Related products
जवाहरलाल नेहरू | Jawaharlal Nehru
जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी स्वातंत्र्य हा जुन्या मार्गाचा शेवट नव्हता, नव्या वाटेचा आरंभ होता. त्याआधीचा त्यांचा व देशाचा प्रवास एका प्रदीर्घ व अंधाऱ्या वाटेवरील कष्टाचा, वेदनांचा व विजयाचा होता. स्वातंत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते, ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते. आयुष्याची 27 वर्षे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या धकाधकीत, तर त्यातली 10 वर्षे तुरुंगात (एकूण सात वेळा मिळून) काढली होती. ते डिसेंबर 1921 मध्ये प्रथम तुरुंगात गेले. त्यांचा अखेरचा तुरुंगवास 9 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झाला, तो 1041 दिवसांचा होता. अखेरच्या कारावासानंतर दोन वर्षांनी ते देशाचे पंतप्रधान झाले आणि 16 वर्षे त्या पदावर राहिले. त्या काळात त्यांनी देशाच्या आधुनिकतेची, लोकशाही वाटचालीची व सर्वक्षेत्रिय प्रगतीची पायाभरणी केली. अशा या नेत्याचे चरित्र समजून घेतले पाहिजे, कारण एका मर्यादित अर्थाने ते देशाचेही चरित्र असते.
टॉकिंग पॉलिटिक्स | Talking politics
एक तत्त्वज्ञ म्हणून भिखू पारेख यांनी आपली उभी हयात उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्यात घालवली, कारण तत्त्वज्ञानाचा अर्थच तो असतो. आपल्या तत्त्वज्ञानाबाबत आणि तात्विक भूमिकांबद्दल ते नेहमीच दृढ आणि सुसंगत राहत आले आहेत, हे त्यांचा जीवनप्रवास पहिल्यांना पुरेपूर माहीत आहे. आयुष्याची पन्नासहून अधिक वर्षे त्यांनी समानतेबाबतच्या तत्त्वचिंतनासाठी आणि समानतेसाठीच्या प्रत्यक्ष लढ्यासाठी वेचली आहेत. तात्विक दृष्ट्या गहन आणि नैतिक दृष्ट्या बांधिलकी मांडणाऱ्या त्यांच्या चिंतनाची व्यापक पातळीवर प्रशंसा झालेली आहे आणि हे चिंतन मूलगामी स्वरूपाचे आहे असे मानले गेले आहे. त्यांच्या आयुष्याची आणि विचारांची ओळख करून देणारे हे संवादरुपी पुस्तक म्हणजे माझ्या मनात त्यांच्याविषयी असलेल्या आदराची निशाणी आहे. त्यांचा वैचारिक वारसा असे या पुस्तकाबाबत बोलणे हे अकाली होईल, पण कल्पनाही करता येणार नाही इतक्या व राजकीय शक्यतांचा पट त्यांनी इथे उघड केला आहे.
Lokshahichi Aaradhana | लोकशाहीची आराधना
लोकशाहीची आराधना (भाषणसंग्रह) – बॅरिस्टर नाथ पै यांनी संसदेबाहेर केलेल्या १५ भाषणांचा संग्रह. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरील विचारप्रवण करणारी ही शैलीदार भाषणे आहेत.
नोकरशाईचे रंग | Nokarshaiche Rang
देशात आणि जगभरातील अनेक देशांच्या राजधान्यांत, भारत सरकारच्या सल्लागारपासून प्रभारी राजदूतापर्यंत अनेक भूमिका प्रभावीपणे पार पाडत असतानाही सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून चिंतन, मनन व लेखन करणारे ‘विश्वनागरिक’ ज्ञानेश्वर मुळे, आपल्या सरकारी कोशातून बाहेर पडून वाचकांशी हळूवार संवाद साधत आहेत.
Yugantar | युगांतर
युगांतर (लेखसंग्रह) – व्यक्ती, समष्टी, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, लोकशाही, राजकारण, सेक्युलॅरिझम इत्यादी संकल्पनांवर विचारप्रवर्तक लेख.
Reviews
There are no reviews yet.