वयाच्या 99 व्या वर्षी दादांनी लिहिलेल्या आठवणी म्हणून या पुस्तकाकडे पाहिले तर त्याचे मोल लक्षात येते. आयुष्याच्या या समयी अनेक गाळण्यांतून उतरलेले सत्व आणि स्वत्व म्हणजे हे लेखन आहे. दादांची भाषेवरची व शब्दांवरची पकड आजही कायम आहे आणि तपशिलाबाबतही ते अद्याप काटेकोरच आहेत. नम्रता, प्रामाणिकपणा, लवचीकता, सामंजस्य, समाजभिमुखता, कुटुंबवत्सलता या सद्गुणांचा ग्राहक म्हणून दादा प्रामुख्याने या लेखातून डोकावत राहतात. पण गांधीजींनी जी सात सामाजिक पातके सांगितली त्यातील एक आहे – तत्त्वविहीन राजकारण, त्या पातकाची चाड बाळगणारा राजकारणी म्हणूनही दादा या पुस्तकातून ठळकपणे प्रतिबिंबित होत राहतात.
Sale
Weight | 0.15 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 100 |
Reviews
There are no reviews yet.