प्राचीन , मध्ययुगीन आणि आधुनिक या तिन्ही काळातील स्थित्यंतर हा अभ्यासाचा व चिंतनाचा विषय असलेले खूप कमी लोक आजच्या महाराष्ट्रात आहेत, त्यातील एक महत्वाचे नाव सुरेश द्वादशीवार. दोन दशके मुख्यतः प्राध्यापक आणि तीन दशके मुख्यतः पत्रकार- संपादक अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे. धर्म , नीती, तत्वज्ञान आणि विज्ञान या परिप्रेक्षात त्यांनी केलेले चिंतन या पुस्तकात आले आहे. आपला समाज समूहाकडून स्वतःकडे कशी वाटचाल करीत आहे, या मन्वंतराचा वेध यात घेतला आहे. विषय गंभीर व वैचारिक आहे, पण ललितरम्य पद्धतीने मांडला आहे..
Sale
₹175.00 ₹140.00
₹250.00 ₹200.00
₹250.00 ₹200.00
₹300.00 ₹240.00
₹125.00 ₹100.00
₹350.00 ₹280.00
₹90.00 ₹80.00
₹200.00 ₹160.00
₹600.00 ₹500.00
₹90.00 ₹80.00
₹350.00 ₹280.00
₹175.00 ₹140.00
Manvantar | मन्वंतर
मन्वंतर (लेखसंग्रह) – आपल्या समाजाचा प्रवास समूहाकडून स्वतःकडे होत असताना काय स्थित्यंतरे झाली व काय होत आहेत, या विषयीचे वैचारिक लेख.
Meet The Author
Yugantar | युगांतर
युगांतर (लेखसंग्रह) – व्यक्ती, समष्टी, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, लोकशाही, राजकारण, सेक्युलॅरिझम इत्यादी संकल्पनांवर विचारप्रवर्तक लेख.
Tarangan | तारांगण
तारांगण (व्यक्तिचित्रे) – यदुनाथ थत्ते, अनंत भालेराव, बाबा आमटे, भिंद्रानवाले, सुरेश भट इत्यादी १२ व्यक्तींवरील ललितरम्य व विचारगम्य लेख.
Koham | कोsहम
कोsहम (कादंबरी) – ‘मी कोण’ या प्रश्नापासून तत्वज्ञान सुरु होते, त्याचा वेध घेणारी ललितरम्य व उद्बोधक कादंबरी.
Tujhyasave Tujhyavina | तुझ्यासवे तुझ्याविना
‘तरुण भारत मध्ये असताना मी संघाचा नव्हतो, लोकमत मध्ये राहून मी काँग्रेसचा झालो नाही आणि ‘लोकसत्ता’त असतानाही मी संचालकांची तरफदारी कधी केली नाही. पदे सोडली, संघटना सोडल्या, एकटे राहणे पसंत केले अन् त्यासाठी प्रत्येक पावलागणिक तसे राहण्याची किंमत चुकवत राहिलो. किमतीहून मूल्य मोठे असते, असे तूही म्हणायचीस. माझ्या तशा निर्णयांच्या मागे दर वेळी तू उभी राहिलीस.
Ekaki | एकाकी
एकाकीपण ही केवळ मानसिकता असते काय ? की, ते त्याहून खरे व मुलभूत वास्तव असते ? माणसांना आधार लागतो. तो असला तरी त्यांना कुणी तरी सोबत व हाताशी आहे असे वाटते. तो आधार असला वा गेला तर त्याच्या वाट्याला येते ते एकाकीपण जरा वेगळे असले, तरी तशा एकूणच एकाकी मानसिकतेचा तो भाग असतो.
Weight | 0.18 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 168 |
Be the first to review “Manvantar | मन्वंतर” Cancel reply
Related products
स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत | Swatantryasangramache Mahabharat
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी, तरुण कार्यकर्त्यांसाठी आणि सर्वसामान्य वाचकांसाठी स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास इंग्रजीतील माझ्या पुस्तकापेक्षा अधिक सविस्तरपणे लिहावा, असे मला तीव्रतेने वाटले. राष्ट्र सेवादलात पूर्वी काम करताना स्वातंत्र्य लढ्याच्या कथांमध्ये रंगून जाणारे सेवादल सैनिक आणि कार्यकर्ते यांची आठवण मला झाली. त्यांच्याशी माझे जसे अतूट नाते होते, तसेच ना विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांशी आणि सध्याच्या विद्यार्थीवर्गाशी जुळावे, अशी ओढ माझ्या मनात निर्माण झाली, त्यातूनच हे ‘स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत’ लिहिले गेले.
Chale Jao – 1942 Chya Tharawawaril Bhashne | चले जाव – 1942 च्या ठरावावरील भाषणे
चले जाव (भाषणसंग्रह) – ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथे ‘चले जाव’ ठराव मंजूर झाला, त्या सभेत गांधींनी केलेली तीन भाषणे आणि नेहरू, पटेल, आझाद या तिघांचे एक भाषण संकलित करण्यात आले आहे. ही ऐतिहासिक भाषणे पहिल्यांदाच पुस्तकरूपाने एकत्रितपणे प्रसिद्ध झाली आहेत.
Center Page | सेंटर पेज
सेंटर पेज (लेखसंग्रह) – राजकीय, सामाजिक क्षेत्रातील ४० व्यक्तींच्या वर्तनातील व कार्यातील विसंगती व विरोधाभास टिपत केलेले मर्मभेदी लेखन.
Lokmanya Tilak | लोकमान्य टिळक
टिळकांच्या जन्मशताब्दी वर्षी, म्हणजे 1956 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे आयोजित स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणारे अ. के. भागवत व ग. प्र. प्रधान यांनी लिहिलेले टिळकांचे इंग्रजी चरित्र.
कानोसा : भारतातील मुस्लीम मनाचा | Kanosa- Bhartatil Muslim Manacha
कानोसा : भारतातील मुस्लीम मनाचा (लेखसंग्रह) – महाराष्ट्रीय मुसलमान, मुंबईकर मुसलमान, भारतीय मुसलमान, हिंदू -मुस्लीम संबंध, कानोसा : भारतीय मुस्लीम मनाचा या पाच लेखांचा संग्रह.
व्यक्ती आणि व्याप्ती | Vyakti Ani Vyapti
शिक्षक, प्राध्यापक, कार्यकर्ता, पत्रकार, लेखक, संपादक आणि समीक्षक असे प्रमुख आयाम असलेल्या विनय हर्डीकर यांच्या लेखनकार्याचे विशेष महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे. मात्र रूढार्थाने लिहिली जातात तशी ही व्यक्तिचित्रे नसतात, त्यांना व्यक्तिविमर्श म्हणणेच योग्य ठरेल. कारण त्या-त्या व्यक्तीच्या विचारांचा वा कार्याचा गाभा व आवाका या लेखनाच्या केंद्रस्थानी असतो. त्यामुळे कोणाही वाचकाच्या मनात त्या व्यक्तिविमर्शांचा सखोल ठसा उमटतो; इतका की ती व्यक्ती म्हणजे विनय हर्डीकरांच्या लेखात चित्रित झाली आहे तशीच असणार, असा समज त्या व्यक्तीला न ओळखणाऱ्यांचा होतो. आणि त्या व्यक्तीला आधीपासून ओळखत असणाऱ्या वाचकांना वाटते, आपल्याला आता कुठे ही व्यक्ती नीट समजली आहे.
Reviews
There are no reviews yet.