सण समारंभांचं मूळ आपल्या अतिप्राचीन वेदादी साहित्य व पुराणांमध्ये सापडतं. ही मुळं शोधून हे सण समारंभ का निर्माण झाले, त्या वेळी त्यांचा काय उपयोग होता किंवा गरज होती; आज त्यांचा किती उपयोग आहे व गरज आहे का; आपल्या प्रगतीच्या ते आड येत आहेत का; त्यांच्यापायी आपण आपला किती वेळ, पैसा आणि मेहनत खर्च करावी याचा ऊहापोह प्रत्येक व्यक्तीने आपापल्या बुद्धिविचारानुसार स्वतंत्रपणे करायला हवा. तसाच तो सार्वजनिक पातळीवरही व्हायला हवा. कारण सार्वजनिक उत्सवांनाही ऊत आला आहे. ही प्रक्रिया व्यक्तिगत पातळीवर तरी सुरू करू या. ती कशी ते या पुस्तकात सुचविले आहे.
Sale
₹60.00 ₹40.00
₹400.00 ₹320.00
₹200.00 ₹160.00
₹250.00 ₹200.00
₹150.00 ₹120.00
सणांचे कुळ आणि उत्सवांचे मूळ | Sananche Kul Ani Utsavanche Mul
सणांचे कुळ आणि उत्सवांचे मूळ (लेखसंग्रह) – भारतातील विविध सणांचा उगम कसा झाला, त्यांचा मूळ हेतू काय होता आणि आता ते सण कितपत कालसुसंगत आहेत, याची विवेकवादाच्या अंगाने केलेली मांडणी.
Meet The Author
No products were found matching your selection.
Weight | 0.15 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 120 |
Be the first to review “सणांचे कुळ आणि उत्सवांचे मूळ | Sananche Kul Ani Utsavanche Mul” Cancel reply
Related products
Sadhana Balkumar Diwali 2022 | साधना बालकुमार दिवाळी 2022
आसामी, अरेबियन, कुर्दिश, पर्शियन, कोरियन आणि इंग्रजी या सहा भाषांमधील सहा चित्रपटांवरील गोष्टीरूप लेख.
या सर्व चित्रपटांच्या केंद्रस्थानी मुले आणि त्यांचे विश्व आहे, पण रूढ अर्थाने हे बालचित्रपट नाहीत.
मानवजातीची कथा | Manavjatichi Katha
या पुस्तकात इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी मांडल्या आहेत. त्या-त्या घडामोडीतील महत्त्वाच्या व्यक्तींभोवती त्या-त्या घडामोडी रंगविल्या आहेत. या जगात स्थूल दृष्टीने दोन प्रकारचे नेते आढळतात :
संस्कृती व सुधारणा यांना पुढे नेणारे आणि त्यांना मागे खेचणारे. शांतीचे पुरस्कर्ते पहिल्या वर्गात येतात. युद्धे पेटविणारे दुसऱ्या वर्गात येतात. जे मोठमोठे धर्मसंस्थापक होऊन गेले, त्यांनी ‘शांतीनेच खरी प्रगती होते’ या तत्त्वावरील आपली श्रद्धा आपल्या जीवनात उत्कटपणे दाखविलेली आहे. इतिहासाचे नीट निरीक्षण केल्यास आपणास कबूल करावे लागेल, की धर्मसंस्थापकांची ही श्रद्धा यथार्थ आहे. ही श्रद्धा म्हणजे केवळ धर्मग्रंथांतील आशावाद नव्हे; ही श्रद्धा स्वतः सिद्ध असे इतिहासातील एक सत्य आहे.
‘शांतीचे दूतच पृथ्वीचे वारसदार होतील’ हा दृष्टिकोन ‘मानवजातीची कथा’ हे पुस्तक लिहिताना डोळ्यांसमोर आहे.
Shastriji | शास्त्रीजी
‘प्रकांड पंडित’ हे विशेषण विसाव्या शतकातील महाराष्ट्रातील विचारवंतांच्या संदर्भात वापरायचे असेल तर जी काही नावे पटकन समोर येतात, त्यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे नाव हमखास असतेच! 27 जानेवारी 1901 ते 27 मे 1994 असे 93 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. संस्कृत भाषा व साहित्य यातील त्यांची विद्वता विशेष उल्लेखनीय आणि धर्म, संस्कृती, साहित्य, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र इत्यादी विषयांवर त्यांनी केलेले अभ्यास-संशोधन व लेखन पायाभूत मानले जाते.
अशा या शास्त्रीजींच्या साथीत व संगतीत वाई येथे जवळपास दोन दशके वावरलेल्या रा. ग. जाधव यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. शिवाय, रा. ग. जाधव हे मराठीतील नामवंत साहित्य समीक्षक म्हणून ओळखले जातात, त्यामुळे त्यांनी शास्त्रीजींचे कार्य आणि कर्तृत्व ज्या रसिकतेने व विश्लेषक बुद्धीने रेखाटले आहे, त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
दृष्टीकोन आकाराला येईपर्यंतचे वाचन | Drushtikon Aakarala Yeiparyantche Wachan
₹50.00नियोजित विशेषांक एक थीम घेऊन काढणार आहोत, ‘दृष्टीकोन आकाराला येईपर्यंतचे वाचन’ अशी ती थीम आहे.
सामान्यतः वय वर्षे 25 च्या आत-बाहेरच्या टप्प्यावर आपला स्वतःचा असा एक दृष्टीकोन आकाराला येतो. अर्थातच, तो दृष्टीकोन आकाराला येण्यामध्ये अनेक घटक कारणीभूत असतात; मात्र काही जणांच्या बाबतीत वाचन हा विशेष महत्त्वाचा, कदाचित सर्वांत महत्त्वाचा घटक ठरलेला असतो.
तर ज्यांचा निश्चित व निर्णयात्मक असा दृष्टीकोन आकाराला येण्यात वाचन हा विशेष महत्त्वाचा घटक ठरला असावा, अशा 16 व्यक्तींना आम्ही या अंकासाठी लेख लिहिण्याची विनंती केली आहे.
1500 शब्द मर्यादेतील लेख म्हणजे अंकाची चार पाने प्रत्येकासाठी राखून ठेवली आहेत. दृष्टीकोन आकाराला येईपर्यंतचे वाचन कोणत्या प्रकारचे होते आणि त्या वाचनाने दृष्टीकोन आकाराला येण्याची प्रक्रिया कशी गतिमान केली, हा मध्यवर्ती बिंदू ठेवून तो लेख लिहावा, अशी विनंती त्या सर्वांना केली आहे. अर्थातच, त्यानंतरच्या टप्प्यातील किंवा कालखंडातले वाचन, बदललेल्या धारणा हे या लेखांमध्ये अपेक्षित नाही.
कारण, या थीमचा मुख्य हेतू हा आहे की, हा अंक वाचून आजच्या तरुण पिढीला स्वतःचे मूल्यमापन करता यावे, स्वतःचा दृष्टीकोन तपासून घेता यावा. म्हणजे या अंकातील मान्यवरांना त्यांच्या पंचविशीच्या टप्प्यावर वाचनाद्वारे काय मिळाले आणि त्या तुलनेत विचार प्रक्रियेच्या बाबतीत आपण नेमके कुठे आहोत, याचा अंदाज आजच्या युवा वर्गाला यावा. शिवाय, दृष्टीकोन आकाराला येण्यामध्ये वाचन किती महत्त्वाची भूमिका बजावू शकते आणि त्यामध्ये किती विविध स्तर व प्रकार असतात, हेही या अंकातून अधोरेखित होऊ शकेल.
लोकशाहीची आराधना | Lokshahichi Aaradhana
लोकशाहीची आराधना (भाषणसंग्रह) – बॅरिस्टर नाथ पै यांनी संसदेबाहेर केलेल्या 15 भाषणांचा संग्रह. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरील विचारप्रवण करणारी ही शैलीदार भाषणे आहेत.
Reviews
There are no reviews yet.