वस्तुतः हे पुस्तक ठरवून लिहिले गेलेले नाही. वेगवेगळ्या निमित्ताने जे बोलले गेले व त्या-त्या वेळी प्रसिद्ध होत गेले, त्यातून जुळून आलेले हे पुस्तक आहे. पण या सर्व लेखनाला जोडणारे समान व बळकट धागे अनेक आहेत. शिवाय, या लेखनाच्या मध्यवर्ती वाहतो आहे एक जोरदार प्रवाह. तो प्रवाह आहे 2013 नंतरच्या दहा वर्षांत या देशातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जीवनात केंद्रीय सत्तेने केलेला अनिष्ट व आक्षेपार्ह हस्तक्षेप. त्या हस्तक्षेपाचा दीर्घकालीन परिणाम प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये आणि धर्मनिरपेक्षता यांच्यावर झालेला आहे. म्हणून गेल्या दशकातील भारतात केंद्रीय सत्तेने केलेले अतिक्रमण समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
₹250.00 ₹200.00
सत्तेला अंगावर घेता येतं | Sattela Angavar Gheta Yeta
Meet The Author
No products were found matching your selection.
| Weight | 0.2 kg |
|---|---|
| Dimensions | 14 × 1.5 × 21.5 cm |
| Size | M, S |
Related products
चले जाव – 1942 च्या ठरावावरील भाषणे | Chale Jao – 1942 Chya Tharawawaril Bhashne
चले जाव (भाषणसंग्रह) – 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे ‘चले जाव’ ठराव मंजूर झाला, त्या सभेत गांधींनी केलेली तीन भाषणे आणि नेहरू, पटेल, आझाद या तिघांचे एक भाषण संकलित करण्यात आले आहे. ही ऐतिहासिक भाषणे पहिल्यांदाच पुस्तकरूपाने एकत्रितपणे प्रसिद्ध झाली आहेत.
टॉकिंग पॉलिटिक्स | Talking politics
एक तत्त्वज्ञ म्हणून भिखू पारेख यांनी आपली उभी हयात उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्यात घालवली, कारण तत्त्वज्ञानाचा अर्थच तो असतो. आपल्या तत्त्वज्ञानाबाबत आणि तात्विक भूमिकांबद्दल ते नेहमीच दृढ आणि सुसंगत राहत आले आहेत, हे त्यांचा जीवनप्रवास पहिल्यांना पुरेपूर माहीत आहे. आयुष्याची पन्नासहून अधिक वर्षे त्यांनी समानतेबाबतच्या तत्त्वचिंतनासाठी आणि समानतेसाठीच्या प्रत्यक्ष लढ्यासाठी वेचली आहेत. तात्विक दृष्ट्या गहन आणि नैतिक दृष्ट्या बांधिलकी मांडणाऱ्या त्यांच्या चिंतनाची व्यापक पातळीवर प्रशंसा झालेली आहे आणि हे चिंतन मूलगामी स्वरूपाचे आहे असे मानले गेले आहे. त्यांच्या आयुष्याची आणि विचारांची ओळख करून देणारे हे संवादरुपी पुस्तक म्हणजे माझ्या मनात त्यांच्याविषयी असलेल्या आदराची निशाणी आहे. त्यांचा वैचारिक वारसा असे या पुस्तकाबाबत बोलणे हे अकाली होईल, पण कल्पनाही करता येणार नाही इतक्या व राजकीय शक्यतांचा पट त्यांनी इथे उघड केला आहे.
Lokmanya Tilak | लोकमान्य टिळक
टिळकांच्या जन्मशताब्दी वर्षी, म्हणजे 1956 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे आयोजित स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणारे अ. के. भागवत व ग. प्र. प्रधान यांनी लिहिलेले टिळकांचे इंग्रजी चरित्र.
लोकशाहीची आराधना | Lokshahichi Aaradhana
लोकशाहीची आराधना (भाषणसंग्रह) – बॅरिस्टर नाथ पै यांनी संसदेबाहेर केलेल्या 15 भाषणांचा संग्रह. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरील विचारप्रवण करणारी ही शैलीदार भाषणे आहेत.
युगांतर | Yugantar
युगांतर (लेखसंग्रह) – व्यक्ती, समष्टी, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, लोकशाही, राजकारण, सेक्युलॅरिझम इत्यादी संकल्पनांवर विचारप्रवर्तक लेख.





Reviews
There are no reviews yet.