1949 मध्ये माओच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये क्रांती झाली. आणि 1978 मध्ये डेंग यांच्या नेतृत्वाखाली चीनने नवे वळण घेऊन महासत्ता होण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. त्यानंतरच्या चाळीस वर्षात चीनने अर्थव्यवस्था अधिकाधिक खुली करीत जोमाने आर्थिक विकास साधला. कोट्यवधी गरीब लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढून मानाने जगायला शिकविले.जलद आर्थिक विकासामुळे चीनने आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत मनाचे स्थान प्राप्त केले खरे ! मात्र त्या विकासप्रक्रियेत अनेक परपस्पर विरोध सामावले आहेत. चीनचे एक भव्य स्वप्नही आहे, जगाचे नेतृत्व करुन आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर मोठा प्रभाव टाकण्याचे ! चीनच्या या विकासशैलीमुळे चीनमध्ये आणि जगात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.चीनचे जागतिक व्यवस्थेमध्ये शांततापूर्ण मार्गाने सामिलीकरण कसे करायचे, हा आता जगापुढील मोठा प्रश्न आहे. मागील चाळीस वर्षांतील चीनच्या या आर्थिक आणि राजकीय वाटचालीचा, त्यामागील विविध प्रेरणांचा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचा मागोवा या पुस्तकात घेतला आहे.
Chale Jao – 1942 Chya Tharawawaril Bhashne | चले जाव – 1942 च्या ठरावावरील भाषणे
₹80.00चले जाव (भाषणसंग्रह) – ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथे ‘चले जाव’ ठराव मंजूर झाला, त्या सभेत गांधींनी केलेली तीन भाषणे आणि नेहरू, पटेल, आझाद या तिघांचे एक भाषण संकलित करण्यात आले आहे. ही ऐतिहासिक भाषणे पहिल्यांदाच पुस्तकरूपाने एकत्रितपणे प्रसिद्ध झाली आहेत.
Reviews
There are no reviews yet.