न पेटलेले दिवे (व्यक्तिचित्रे) – लेखकाला त्याच्या आयुष्यात भेटलेली अशी 14 लहान मुले-मुली जी खूप चमकदार होती, पण अकाली विझली. राजा शिरगुप्पेचं हे पुस्तक अनेक दृष्टींनी परिणाम करतं. कधी ते आपल्याला पेटवतं. कधी थंड पाणी ओततं. कधी सुन्न करेल, तर कधी भडकवेलही.
View cart “माझी काटेमुंढरीची शाळा । Mazi Katemundharichi Shala” has been added to your cart.
Sale
₹175.00 ₹140.00
₹300.00 ₹240.00
₹150.00 ₹120.00
₹225.00 ₹180.00
₹150.00 ₹120.00
₹250.00 ₹200.00
₹200.00 ₹160.00
₹150.00 ₹120.00
न पेटलेले दिवे | Na Petlele Dive
न पेटलेले दिवे (व्यक्तिचित्रे) – लेखकाला त्याच्या आयुष्यात भेटलेली अशी 14 लहान मुले-मुली जी खूप चमकदार होती, पण अकाली विझली.
Meet The Author
शोधयात्रा : ग्रामीण महाराष्ट्राची | Shodhyatra : Gramin Maharashtrachi
शोधयात्रा : ग्रामीण महाराष्ट्राची (रिपोर्ताज) – महाराष्ट्र राज्य स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाली तेव्हा, ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागात भ्रमंती करून टिपलेली क्षणचित्रे.
Weight | 0.15 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 128 |
Be the first to review “न पेटलेले दिवे | Na Petlele Dive” Cancel reply
Related products
माझी वाटचाल | Mazi Vatchal
जीवनाच्या वाटचालीतील मुख्यत: राजकीय कार्याचे निवेदन करणाऱ्या ‘माझी वाटचाल’ या आत्मकथेत ग. प्र. प्रधान यांनी थोर नेत्यांच्या व विचारवंतांच्या जीवनाचा आणि विचारांचा त्यांच्यावर संस्कार कसा झाला आणि समविचारी सहकाऱ्यांमुळे या वाटचालीत त्यांना साफल्य कसे लाभले हे भावपूर्ण रितीने सांगितले आहे. शिक्षणक्षेत्रातील आपल्या कामाचे आणि लेखन संसाराचे वर्णन करतानाच प्रधानांनी त्यांच्या कौटुंबिक जीवनाचेही हृद्य चित्र रेखाटले आहे.
शतकाच्या सुवर्णमुद्रा | Shatakachya Suvarmudra
आधुनिक मराठी कवितेचे एक शतक सरले; दुसरे उदयाला येण्याचा हा क्षण आहे. उत्कर्ष आणि अपकर्ष यांची आंदोलने समतोल मनाने झेलून परंपरेचे भान मात्र जागृत ठेवायला हवे. या छोट्याशा पुस्तकाचा हेतू एवढाच आहे. आपला परामर्श सर्वसमावेशक नसला तरी प्रातिनिधिक मात्र असला पाहिजे, या दृष्टीने टाकलेली ही केवळ पहिली पावले आहेत. एका शतकाच्या वाटचालीचा हा बोलका आलेख आहे, गेल्या शतकाने उचललेल्या पावलांचे ठसे आज सुवर्णमुद्रांसारखे वाटतात. त्यांच्यावर नजर टाकून उज्ज्वल भविष्याचा वेध घ्यायला हवा.
श्याम | Shyam
24 डिसेंबर 1899 ते 11 जून 1950 असे जेमतेम पन्नास वर्षांचे आयुष्य साने गुरुजींना मिळाले. त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा 22 वर्षांचा कालखंड कोणी लिहिलेला नाही. त्यासाठीच त्यांनी स्वतःच लिहिलेली चार पुस्तके हाच काय तो मुख्य दस्तऐवज. श्यामची आई, श्याम, धडपडणारा श्याम, श्यामचा जीवन विकास याच त्या चार आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या. श्यामची आई मध्ये गुरुजींनी आपल्या आईला केंद्रस्थानी ठेवून बालपण मांडले आहे, त्यात नंतरचा काळही थोडा येऊन जातो. ‘श्याम’ या पुस्तकात पाचवीसाठी पुण्यात मामाकडे येणे, सहा महिन्यानंतर पुणे सोडून दापोलीत चार वर्षे आतेकडे राहून शिक्षण घेणे हा कालखंड आला आहे. शालेय वयातील श्यामचे भावविश्व, विचारविश्व, श्यामचे अनुभव आणि त्यावरील श्यामचे चिंतन ‘श्याम’ मधे आले आहे.
माणूस आहे म्हणून | MANUS AAHE MHANUN
माणसांवर आणि माणूसपणावर विश्वास असलेले मोहिब कादरी हे गेल्या दहा वर्षांपासून लक्षणीय स्वरूपाचे आत्मपर लेखन करीत आहेत. ‘माणूस आहे म्हणून’ हा त्यांचा आत्मपर लेखनाचा दुसरा संग्रह आहे.
सुंदर पत्रे । Sundar Patre
सुधा, तुला अण्णांनी लिहिली तशी पत्रे मराठीत पूर्वी कोणी लिहिली नव्हती आणि पुढेही कोणी लिहील असे वाटत नाही. काचेच्या पात्रात ठेवलेल्या सोनेरी माशांची प्रत्येक हालचाल ज्याप्रमाणे बाहेरून दिसते, त्याप्रमाणे तुला लिहिलेल्या प्रत्येक पत्रातून गुरुजींचे – तुझ्या अण्णांचे मन स्पष्ट दिसून येत असे. त्यांच्या मनाचे सारे भाव त्या पत्रांतून उमटलेले आहेत.
सुधाताई, तू मोठी भाग्याची. तुझ्या अण्णांचा थोरल्या भावावर जसा जीव होता तसाच तुझ्यावरही. देवाघरी जातानासुद्धा त्याचा फोटो त्यांनी आपल्या उजव्या खिशात ठेवला होता! गुरुजी नाना ठिकाणी हिंडत. नाना देश, नाना वेष, सृष्टीचे नाना प्रकार ते पाहत. त्यांची दृष्टी जरी भूमीकडे सदैव वळलेली दिसे, तरी त्यांच्या नजरेतून बारीकसारीक गोष्टदेखील निसटत नसे. त्यांची नजर जशी रत्नपारख्याची होती! ती चांगले तेवढे टिपून घेई आणि ज्यात आयब असेल, दोष असेल ते सोडून देई.
साऱ्या देशभर हिंडून आणि शेकडो ग्रंथ चाळून साक्षेपाने गोळा केलेल्या सुमधुर, सुरस, सुगंधी नि टपोर स्मृतींचे द्रोणच्या द्रोण भरून ते तुला दर शनिवारी पाठवीत. मग तू भाग्याची नाहीस का? आणि तुला पाठवलेल्या या भेटीचा स्वाद उभ्या महाराष्ट्रातल्या शेकडो, हजारो मुलांना गेले वर्षभर चाखायला मिळाला, हे त्यांचे भाग्य ! तुला लिहिलेली पत्रे महाराष्ट्रातील सर्व बाळगोपाळांचा वारसा होणार आहे, हे तुझ्या अण्णांना ठाऊक होते. त्यांच्यापाशी आप-परभावच नव्हता. श्यामची आई साऱ्या महाराष्ट्राची आई झाली, तशी अण्णांची तू सुधाताई साऱ्या महाराष्ट्राची सुधाताई झाली आहेस.
– ना. ग. गोरे
मुलांसाठी विवेकानंद | Mulansathi Vivekanand
एक अनाम संन्यासी, शिक्षण फारसे नसलेला अस्वस्थ होऊन तीन वर्षे भारत उभा – आडवा पिंजून काढणारा हा देश, त्याची अवनती, त्याची कारणे आणि त्यावरचे उपाय अस्वस्थ होऊन शोधत हिंडणारा जगात काय, भारतात काय तो ज्या कलकत्ता शहरात लहानाचा मोठा झाला, त्या शहरातसुद्धा त्याचे नाव फारसे कोणाला माहीत नव्हते आणि एक दिवस अचानक भारतात नव्हे तर जगभर फक्त त्याच्याच नावाचा जयजयकार तुम्हाला माहीत आहे?
सर्वधर्म परिषदेचे आमंत्रण विवेकानंदांना नव्हते!
खिल्ली उडवून त्यांना परत पाठवले होते!
कसे मिळविले त्यांनी आमंत्रण ? कसे मिळविले त्यांनी अद्भुत यश?
Reviews
There are no reviews yet.