सण समारंभांचं मूळ आपल्या अतिप्राचीन वेदादि साहित्य व पुराणांमध्ये सापडतं. ही मुळं शोधून हे सण समारंभ का निर्माण झाले, त्यावेळी त्यांचा काय उपयोग होता किंवा गरज होती; आज त्यांचा किती उपयोग आहे व गरज आहे का; आपल्या प्रगतीच्या ते आड येत आहेत का; त्यांच्यापायी आपण आपला किती वेळ, पैसा आणि मेहेनत खर्च करावी याचा ऊहापोह प्रत्येक व्यक्तीने आपापल्या बुद्धिविचारानुसार स्वतंत्रपणे करायला हवा. तसाच तो सार्वजनिक पातळीवरही व्हायला हवा. कारण सार्वजनिक उत्सवांनाही ऊत आला आहे. ही प्रक्रिया व्यक्तिगत पातळीवर तरी सुरू करू या. कशी ते या पुस्तकात सुचविले आहे.
Shastriji | शास्त्रीजी
₹160.00‘प्रकांड पंडित’ हे विशेषण विसाव्या शतकातील महाराष्ट्रातील विचारवंतांच्या संदर्भात वापरायचे असेल तर जी काही नावे पटकन समोर येतात, त्यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे नाव हमखास असतेच! २७ जानेवारी १९०१ ते २७ मे १९९४ असे ९३ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. संस्कृत भाषा व साहित्य यातील त्यांची विद्वता विशेष उल्लेखनीय आणि धर्म, संस्कृती, साहित्य, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र इत्यादी विषयांवर त्यांनी केलेले अभ्यास-संशोधन व लेखन पायाभूत मानले जाते.
अशा या शास्त्रीजींच्या साथीत व संगतीत वाई येथे जवळपास दोन दशके वावरलेल्या रा. ग. जाधव यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. शिवाय, रा. ग. जाधव हे मराठीतील नामवंत साहित्य समीक्षक म्हणून ओळखले जातात, त्यामुळे त्यांनी शास्त्रीजींचे कार्य आणि कर्तृत्व ज्या रसिकतेने व विश्लेषक बुद्धीने रेखाटले आहे त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
Reviews
There are no reviews yet.