Shop

Saleनवी पुस्तके

पक्षी उन्हाचा – सात विद्यापीठांच्या आवारात | Pakshi Unhacha – Sat Vidyapithanchya Aawarat

300.00

विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक आणि प्रशासक या पाच प्रकारच्या भूमिका निभावताना डॉ. राजन हर्षे यांनी पुणे, जेएनयू (दिल्ली), सियान्स पो (पॅरिस), कोलंबिया (न्यू यॉर्क), हैदराबाद, अलाहाबाद आणि एसएयू (दिल्ली) या सात विद्यापीठांच्या आवारात मुशाफिरी केली आहे. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन हा ध्येयवाद त्या सर्व भूमिकांना जोडणारा दुवा होता. तब्बल पाच दशकांच्या त्या प्रवासाचे एका जिप्सी वृत्तीने केलेले हे आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण आहे. या पुस्तकात बारा दीर्घ लेख आहेत. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टीकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाज जीवनावर भाष्य हे चार घटक या लेखनाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे हे पुस्तक आत्मकथनात्मक वाटेल, प्रत्यक्षात हे एक प्रकारचे कार्यकथन आहे. मोठ्या निष्ठेने व सचोटीने कार्यरत राहताना, परिपूर्णतेचा ध्यास कसा बाळगता येतो आणि उपलब्ध अवकाशात किती परिणामकारक काम करता येते, याचे प्रतिबिंब या पुस्तकात दिसेल.

 

       

Saptahik Sadhana Diwali 2023 | साप्ताहिक साधना दिवाळी 2023

140.00

अनुक्रम

विभाग १

१ ‘श्यामची आई’चे दिग्दर्शन करताना । सुजय डहाके

२ ‘श्यामची आईची पटकथा लिहिताना । सुनील सुकथनकर

३ ‘श्यामची आई’ मध्ये छोटा श्याम साकारताना । शर्व गाडगीळ

 

विभाग २

दोन शास्त्रीय गायकांवर तीन मुलाखती

१ कुमार स्वर एक गंधर्व कथा’ साठी लेखन करताना

– माधुरी पुरंदरे –

२ कुमार स्वर एक गंधर्व कथा साठी चित्रे काढताना

चंद्रमोहन कुलकर्णी

१३ शास्त्रीय गायन हेच क्षेत्रं ठरलं, त्यापूर्वीची मी…

नीला भागवत

 

विभाग ३

दोन मुलाखती। एक शेतकऱ्याची, एक तळेकऱ्याची

१ तलाव संवर्धनाची चळवळ जगभर न्यायची आहे!

• आनंद मल्लीगवाड

२ ‘सह्याद्री फार्म्स’: शेती क्षेत्रातील कोंडी फोडण्याचा एक मार्ग

– विलास शिंदे

 

विभाग ४

संकीर्ण प्रकारातील चार लेख

अवकाशाची दृश्यात्मकता । अमोल पालेकर

घाशीराम व अंताजीची, भेट! | अतुल देऊळगावकर

बालपणीचं पुणं । राजन अन्वर

एक्स्प्रेस पुराण: पहिला अध्याय । विनय हर्डीकर

 

   

जन्म बिगर-कॉंग्रेसवादाचा : खंड 1 आणि खंड 2 | Janma Bigar-Congressvadacha : Khand 1 Ani Khand 2

500.00

खंड 1

भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या पहिल्या अठ्ठावीस वर्षांच्या (1947 ते 1975) अत्यंत महत्त्वाच्या अशा कालखंडाचा समग्र राजकीय इतिहास सदर ग्रंथात दस्तऐवजांसह ग्रथित झाला आहे. या काळात राजकारणावर जवाहरलाल नेहरूप्रणीत आणि नंतर इंदिराप्रणीत काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व पक्ष, विशेषतः सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट पक्ष, जोमाने उतरले होते, परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडली. पुढल्या दशकात सत्ताधारी काँग्रेसबाबत कोणती भूमिका घ्यावी? मर्यादित सहकार्याची की कट्टर विरोधाची? या दुविधेत सोशालिस्ट आणि कम्युनिस्ट पक्ष अडकले. त्या काळात धर्माधिष्ठीत राजकारण करणाऱ्या पक्षांना नाममात्र जनाधार होता.
प्रमुख आणि प्रज्ञावंत राजकीय नेते या नात्याने मधु लिमये या काळात सक्रिय होते. भाषावार प्रांतरचना आणि प्रादेशिक अस्मिता हे मद्दे ऐरणीवर आणून विरोधी पक्षांनी काँग्रेसला आव्हान दिले. जयप्रकाश नेहरू चर्चा, सोशलिस्ट पक्षातील फाटाफूट, राममनोहर लोहियांच्या नव्या पक्षाची स्थापना, प्रसोपा आणि संसोपा यांच्यातील दुरावा, जयप्रकाशांचा राजकीय संन्यास आणि लोहियांबरोबरचे मतभेद इत्यादी बाबींचा सखोल परामर्श लिमये घेतात. चीनच्या आक्रमणानंतर सर्व बिगर काँग्रेस पक्षांची मोट बांधून 1967 ची सार्वत्रिक निवडणूक लढविण्याची व्यूहरचना लोहियांनी केली, त्यातून उत्तर भारतात काँग्रेस पराभूत झाली. पण राज्याराज्यांमधली संयुक्त विधायक दलांची सरकारे राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या तत्त्वशून्य सत्तालालसेपायी गडगडली. या काळाचा हा इत्थंभूत इतिहास.

खंड 2

स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या 30 वर्षांत भारताच्या राजकारणावर 1947 ते 1964 या काळात जवाहरलाल नेहरूंचे आणि नंतरच्या दशकात म्हणजे 1977 पर्यंत इंदिरा गांधींचे वर्चस्व होते. समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्ष हे प्रमुख विरोधी पक्ष असले तरी त्यांचा प्रभाव मर्यादित होता. धर्माधिष्ठीत राजकारण करणाऱ्या जनसंघ, मुस्लीम लीग, अकाली दल यांची शक्तीही नाममात्र होती. 1962 मध्ये चीनने आक्रमण केल्यानंतर भारताला पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. त्यातून निर्माण झालेल्या असंतोषाला वळण देण्यासाठी आणि काँग्रेसची सत्तेवरची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सर्व बिगर काँग्रेसवादी पक्षांची संयुक्त आघाडी करण्याची कल्पना राममनोहर लोहियांना सुचली. त्याचे फलित काय आणि त्या प्रक्रियेत काय गुंतागुंत होती, हे त्या कालखंडातले प्रमुख राजकीय नेते मधु लिमये यांनी या पुस्तकात लिहिले आहे. पहिला खंड वाचकांच्या हाती अगोदरच पडला आहे.
सदर खंडात इंदिरा गांधींनी काँग्रेस पक्षात घडवून आणलेली पहिली फूट, स्वतंत्र पक्ष / जनसंघ / कम्युनिस्ट पक्ष यांची देशाच्या राजकारणातली भूमिका आणि स्थान, सत्तेच्या केंद्रीकरणासाठी इंदिरा गांधींनी वापरलेले नीतिभ्रष्ट मार्ग, बिहार आणि गुजरात आंदोलन आणि जयप्रकाशांचे दिग्विजयी पुनरागमन, विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी त्यांनी चालवलेले प्रयत्न इत्यादी बाबींचे तपशीलवार विश्लेषण आहे.
लोहियांनी मांडलेल्या कल्पनेचे राजकारणाच्या धकाधकीत तीनतेरा वाजले असले, तरी तेच सूत्र घेऊन जयप्रकाशांनी इंदिरा गांधींना कसे आव्हान दिले, याचा आढावा लिमये घेतात आणि 1975 च्या आणीबाणीपाशी हे इतिहास कथन आणून थांबवतात.

 

     

श्यामची आई (सचित्र) | Shyamchi Aai (Sachitra)

240.00

साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर आधारित, सुजय डहाके दिग्दर्शित नवा चित्रपट 2023 च्या दिवाळीत येत आहे. त्या निमित्ताने त्या पुस्तकाची ही नवी आवृत्ती, आता साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

पुस्तकात 42 प्रकरणे आहेत, त्यातील विविध प्रसंगांना अनुरूप अशी सिनेमातील 35 छायाचित्रे समाविष्ट केली आहेत. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सिनेमातील श्यामची आई व वडील, आणि श्यामची भावंडे आहेत. आकर्षक छपाई व हार्ड बाऊंड स्वरूपातील ही आवृत्ती, कोणीही कोणालाही भेट देण्यासाठी आणि संग्रहात ठेवण्यासाठीही महत्त्वाचा ऐवज आहे.

Sadhana Yuva Diwali 2023 | साधना युवा दिवाळी 2023

80.00

अनुक्रम

१. आणि मी ‘श्यामची आई’ पडद्यावर साकारली… – गौरी देशपांडे

२. पुणे ते ऑस्ट्रेलिया व्हाया टीव्ही मीडिया – हर्षदा स्वकुळ

३. हमदर्द विद्यापीठाकडून, उम्मीद अकेडमी कडे – वली रहमानी

४. ‘ऑड मॅन’ चा प्रवास नाशिक ते न्यूयॉर्क- धैर्य दंड

५.  सिलीकॉन व्हॅली. टितोडी आणि किस्सान जीपीटी- प्रतीक देसाई

 

     

Sadhana Balkumar Diwali 2023 | साधना बालकुमार दिवाळी 2023

60.00

अनुक्रमणिका

1. भाषा म्हणजे काय? – गणेश देवी

शब्दांचे सर्वांत मोठे शस्त्र म्हणजे प्रश्न

2. इतिहास म्हणजे काय? – राजा दीक्षित

इतिहासाची साक्षरता वाढली की सामाजिक तेढ कमी होईल!

3. गणित म्हणजे काय ? – बालमोहन लिमये

तर्कशुद्ध विचार हाच गणिताचा मानबिंदू आहे!

4. विज्ञान म्हणजे काय ? – विवेक सावंत

कार्यामागचे कारण शोधणे हा विज्ञानाच्या अभ्यासाचा प्रारंभ असतो…

5. राज्यशास्त्र म्हणजे काय ? – सुहास पळशीकर

लोकशाही का हवी, हे समजून घेण्यासाठी राज्यशास्त्राचा अभ्यास करावा लागतो.

6. अर्थशास्त्र म्हणजे काय ? – नीरज हातेकर

अर्थव्यवस्था म्हणजे देवाण-चैवाणीचे जगभर पसरलेले जाळे’

 

         

Saleनवी पुस्तके

बिजली | Bijali

100.00

सामाजिक तत्त्वज्ञान हे जर या कवीच्या काव्याचे प्रभावी वैशिष्ट्य, तर त्या तत्त्वज्ञानाचे स्वरूप कोणते हेही लक्षात घेणे जरुरीचे आहे. ‘बिजली’ तून व्यक्त होणारी जीवनदृष्टी प्रागतिक, व्यापक आणि सहानुभूतीमय आहे. प्रत्येक युगामध्ये सामाजिक प्रगतीचे एक सूत्र अनुस्यूत असते. इष्टानिष्टतेचा शब्दकूट कोणी कितीही पाडला तरी, ग्रीष्मातील वणव्याप्रमाणे हे सूत्र स्वतःच्या आवेगानेच सतत पुढे जात राहते आणि जाताना स्थितिनिष्ठेच्या जीर्ण गढ्यांचे दहन करून टाकते. हे सूत्र ज्याच्या ध्यानात येते, केवळ ध्यानात येत नाही तर आंतरिक भावनेने जो त्याचे ग्रहण करतो, त्याच्यासंबंधीची बौद्धिक निष्ठा व श्रद्वा ज्याच्या ठिकाणी निर्माण होते असाच कवी त्या युगधर्माचा उद्गाता आणि पुढील काळाचा प्रेषित होऊ शकतो:

श्री. वसंतराव बापट यांना हे सूत्र जाणवलेले आहे. ज्या प्रकारे जाणवायला हवे त्याच प्रकारे जाणवलेले आहे म्हणजे त्यात औट घटकेची उसनवारी नाही, तर आंतरिक निष्ठेतून उत्पन्न झालेला जिव्हाळा आहे; आत्मप्रत्ययाच्या ऐरणीवरून उठलेले स्फुल्लिंग आहेत. कवी समाजक्रांतीचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यातच आजच्या युगधर्माचा त्यांना साक्षात्कार झालेला आहे असे मी मानतो. प्रगतीचे मूलतत्व या दिशेवरूनच निश्चित होऊ शकते. वसंतरावांच्या काव्यामध्ये या तत्त्वज्ञानाच्या अनेक कला आपल्याला प्रकट झालेल्या दिसतात. किंबहुना त्यांच्या काव्याची प्रमुख प्रेरणा आणि त्याचे सामर्थ्य या जीवनदृष्टीमध्येच आहे.

वि. वा. शिरवाडकर (प्रस्तावनेतून)

 

 

1 4 5 6 28