₹200.00 ₹160.00
कालपरवा (लेखसंग्रह) – साधना साप्ताहिकात 2013 ते 2015 या अडीच वर्षांत प्रसिद्ध झालेल्या रामचंद्र गुहा यांच्या सदरातील निवडक 25 लेख.
Ramchandra Guha is is well known Historian in contemporary India. He is the author of 12 bestseller books. This is a book of his column published in Sadhana Weekly. Selected 25 articles published in between Dec 2012 to May 2015 are included in this book. It covers social, political, cultural, literature and environmental issues with reference to historical background
No products were found matching your selection.
Weight | 0.15 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 150 |
सुदीप ठाकूर यांचे हे पुस्तक विविध व्यक्तींच्या मुलाखती, सरकारी कागदपत्रे, पुस्तके, आणि अहवाल यावर आधारित आहे. खूप सावधपणे केलेल्या संशोधनाबरोबरच खूप प्रेमाने लिहिलेले हे पुस्तक म्हणजे एका असाधारण भारतीयाला वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली आहे.
लाल श्याम शाह हे मध्य भारतातील आदिवासींचा आवाज होते, त्यांचा अंतरात्मा होते. ते सही करताना त्यांच्या नावाच्या बरोबर ‘आदिवासी’ हा शब्दही लिहीत असत. ‘लाल श्याम शाह, आदिवासी’ असे ते गर्वाने आणि निर्भयतापूर्वक लिहीत असत. आपल्या लोकांविषयी, समाजाविषयी पूर्ण एकरूपता आणि बांधिलकी दाखवण्याचा तो एक मार्ग होता. आजच्या राजकीय नेत्यांच्या विपरीत त्यांचे वर्तन म्हणावे लागेल. कारण त्यांनी स्वतःच्या राजकीय आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नाही, तर आपल्या समाजाच्या स्वाभिमानासाठी संघर्ष केला. त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी, त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हावा यासाठी, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व पटावे व तरुण पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी हे पुस्तक मोठ्या प्रमाणात वाचले जायला हवे.
– रामचंद्र गुहा (प्रस्तावनेतून)
पंजाब व जम्मू-काश्मीरमध्ये आणि युद्ध आघाडीवरील विभागात फिरताना जे पहिले, ते अनुभव लिहून ठेवावे असे ठरवले. त्या काळाचा आमच्या सर्वांच्या मनावर जो संस्कार घडला, तो कधी पुसला जाणार नाही. त्यामुळे हे निवेदन प्रसिद्ध करावेसे वाटले.
‘तरुण भारत मध्ये असताना मी संघाचा नव्हतो, लोकमत मध्ये राहून मी काँग्रेसचा झालो नाही आणि ‘लोकसत्ता’त असतानाही मी संचालकांची तरफदारी कधी केली नाही. पदे सोडली, संघटना सोडल्या, एकटे राहणे पसंत केले अन् त्यासाठी प्रत्येक पावलागणिक तसे राहण्याची किंमत चुकवत राहिलो. किमतीहून मूल्य मोठे असते, असे तूही म्हणायचीस. माझ्या तशा निर्णयांच्या मागे दर वेळी तू उभी राहिलीस.
या संग्रहातील कविता सादर करताना वसंतरावांनी आपल्या समकालीन, समव्यवसायी साहित्यिकांना इशारा देऊन बजावले आहे… “ध्यानात ठेवा, ज्यांची मान ताठ असेल, ज्यांच्या व्यक्तित्वात पोलादाचे उभे-आडवे ताणेबाणे असतील, सत्याचा भार पेलताना ज्यांचा देह झुकला नसेल आणि कोणत्याही लोभासाठी ज्यांनी आत्मा विकला नसेल, त्यांनाच सरस्वतीच्या दरबारात आज आमंत्रण आहे.” आणीबाणीच्या काळात लेखक, कलावंतांची जी मुस्कटदाबी सुरू झाली होती, तिला सच्च्या लेखकाने व कलावंताने शरण जाता कामा नये, असे वसंतरावांना बजावायचे आहे. यात थोडीफार आढ्यता आहे असे कोणाला वाटेल. पण हा कवितासंग्रह वाचल्यानंतर तेवढी आढ्यता, कवीच्या ठिकाणी असायला हरकत नाही असेच वाचकांचे मत होईल.
– ना. ग. गोरे
आज एकविसाव्या शतकात एवढे संशोधन होऊनही चार्वाकांचा एकही ग्रंथ संशोधकांना सापडला नाही, त्यांची परंपरा समजली नाही की तिचे अवशेष हाती लागले नाहीत. धर्म व सत्ता यांना केलेला विरोध चार्वाकांना सारे काही गमावण्यापर्यंत घेऊन गेला. हिंदू धर्म त्याच्या सहिष्णुतेसाठी प्रसिद्ध आहे. त्याने इतर धर्मांचे ग्रंथ जपले… पण चार्वाकांचा एकही ग्रंथ ठेवला नाही… कारण इतर धर्म कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ईश्वर, मंदिर व भक्ती मानत होते. चार्वाकांचा लढाच त्याविरुद्ध होता.
उच्च शिक्षण पूर्ण करून नवाझ यांनी इंग्लंडमध्ये ‘क्विलिअम’ ही संस्था स्थापन केली आहे, त्याद्वारे ते इस्लाममधील आणि मुस्लिमांमधील कट्टरता दूर व्हावी, या दृष्टीने संघटित प्रयत्न करत आहेत. उदारमतवाद, मानवतावाद, स्त्री-पुरुष समानता, व्यक्तिस्वातंत्र्य यांना इस्लाममध्ये स्थान मिळावे यासाठी ते झगडत आहेत. त्यांच्या या कार्याला पाठिंबा देण्यासाठी सॅम हॅरिस त्यांच्याबरोबर खुली चर्चा करत आहेत. हे पुस्तक म्हणजे त्या दोघांनी केलेल्या चर्चेचे शब्दश: परिलेखन आहे.
Reviews
There are no reviews yet.