सॉक्रेटिस, प्लेटो आणि ॲरिस्टॉटल या गुरू-शिष्यांच्या परंपरेने ग्रीक तत्त्वज्ञानाचा पाया घातला. जगभरचे तत्त्वचिंतन या परंपरेला वंदन करीत आले. त्यापैकी प्लेटोने त्याचे तत्त्वज्ञान दोन भिन्न शैलींत मांडले. पहिली सूत्रबद्ध आणि ग्रांथिक, तर दुसरी नाटकाच्या रोचक रूपातली. पहिली रचना अभ्यासकांसाठी, तर दुसरी सर्वसाधारण वाचकांसाठी. काळाचा महिमा असा की, त्याच्या अकादमीला लागलेल्या आगीत त्याची सूत्रबद्ध रचना जळून नाहीशी झाली. लोकांच्या भाषेत लिहिलेले त्याचे चिंतनच तेवढे पुढे टिकले. त्याच चिंतनाने तत्त्वज्ञ म्हणून प्लेटोला अजरामर केले. ज्ञान हा शैलीने बाधित न होणारा जनसामान्यांचा हक्क आहे, हा या घटनेचा अर्थ… ‘कोऽहम’ ही कादंबरी त्या दिशेने प्रवास करणारी…
View cart “जमिला जावद | Jamila Jawad” has been added to your cart.
Sale
₹175.00 ₹140.00
₹250.00 ₹200.00
₹175.00 ₹140.00
₹300.00 ₹240.00
₹125.00 ₹100.00
₹75.00 ₹60.00
₹200.00 ₹160.00
₹150.00 ₹120.00
₹200.00 ₹160.00
₹125.00 ₹100.00
₹250.00 ₹200.00
₹250.00 ₹200.00
Koham | कोsहम
कोsहम (कादंबरी) – ‘मी कोण’ या प्रश्नापासून तत्वज्ञान सुरु होते, त्याचा वेध घेणारी ललितरम्य व उद्बोधक कादंबरी.
Meet The Author
Yugantar | युगांतर
युगांतर (लेखसंग्रह) – व्यक्ती, समष्टी, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, लोकशाही, राजकारण, सेक्युलॅरिझम इत्यादी संकल्पनांवर विचारप्रवर्तक लेख.
Tarangan | तारांगण
तारांगण (व्यक्तिचित्रे) – यदुनाथ थत्ते, अनंत भालेराव, बाबा आमटे, भिंद्रानवाले, सुरेश भट इत्यादी १२ व्यक्तींवरील ललितरम्य व विचारगम्य लेख.
Manvantar | मन्वंतर
मन्वंतर (लेखसंग्रह) – आपल्या समाजाचा प्रवास समूहाकडून स्वतःकडे होत असताना काय स्थित्यंतरे झाली व काय होत आहेत, या विषयीचे वैचारिक लेख.
Tujhyasave Tujhyavina | तुझ्यासवे तुझ्याविना
‘तरुण भारत मध्ये असताना मी संघाचा नव्हतो, लोकमत मध्ये राहून मी काँग्रेसचा झालो नाही आणि ‘लोकसत्ता’त असतानाही मी संचालकांची तरफदारी कधी केली नाही. पदे सोडली, संघटना सोडल्या, एकटे राहणे पसंत केले अन् त्यासाठी प्रत्येक पावलागणिक तसे राहण्याची किंमत चुकवत राहिलो. किमतीहून मूल्य मोठे असते, असे तूही म्हणायचीस. माझ्या तशा निर्णयांच्या मागे दर वेळी तू उभी राहिलीस.
Ekaki | एकाकी
एकाकीपण ही केवळ मानसिकता असते काय ? की, ते त्याहून खरे व मुलभूत वास्तव असते ? माणसांना आधार लागतो. तो असला तरी त्यांना कुणी तरी सोबत व हाताशी आहे असे वाटते. तो आधार असला वा गेला तर त्याच्या वाट्याला येते ते एकाकीपण जरा वेगळे असले, तरी तशा एकूणच एकाकी मानसिकतेचा तो भाग असतो.
Weight | 0.2 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 204 |
Be the first to review “Koham | कोsहम” Cancel reply
Related products
Dalpatsingh Yeti Gava (Natyasanhita) । दलपतसिंग येती गावा (नाट्यसंहिता)
एका अर्थाने, हे राजकीय प्रचाराचं नाटक आहे, पण हे कमिशन्ड नाटक असलं तरी ते प्रचारनाट्य न करता विचारनाट्य होईल असाच माझा प्रयत्न होता. तिसरी गोष्ट म्हणजे कोणतंही नाटक, मग ते प्रचारनाट्य असो, विचारनाट्य असो वा अगदी मानवी भाव-भावनांना भिडणारं नाटक असो, ते उत्तम नाटक असलं पाहिजे. ते बुद्धीला तर भिडलं पाहिजेच, पण भावनांनाही भिडलं पाहिजे.
– मकरंद साठे (मुलाखतीतून)
Madhughat | मधुघट
मधुघट (लेखसंग्रह) – शेक्सपिअरवरील पाच आणि टॉलस्टॉय , झिवागो, रवींद्रनाथ, सुभाषबाबू, जेन ऑस्टिन इत्यादींवरील आठ अशा एकूण १३ लेखांचा संग्रह.
शतकाच्या सुवर्णमुद्रा | Shatakachya Suvarmudra
आधुनिक मराठी कवितेचे एक शतक सरले; दुसरे उदयाला येण्याचा हा क्षण आहे. उत्कर्ष आणि अपकर्ष यांची आंदोलने समतोल मनाने झेलून परंपरेचे भान मात्र जागृत ठेवायला हवे. या छोट्याशा पुस्तकाचा हेतू एवढाच आहे. आपला परामर्श सर्वसमावेशक नसला तरी प्रातिनिधिक मात्र असला पाहिजे, या दृष्टीने टाकलेली ही केवळ पहिली पावले आहेत. एका शतकाच्या वाटचालीचा हा बोलका आलेख आहे, गेल्या शतकाने उचललेल्या पावलांचे ठसे आज सुवर्णमुद्रांसारखे वाटतात. त्यांच्यावर नजर टाकून उज्ज्वल भविष्याचा वेध घ्यायला हवा.
Karant Chintan | कारंत चिंतन
कारंत चिंतन (लेखसंग्रह) – कन्नड साहित्यिक शिवराम कारंत यांचे विविध विषयांवरील अंतर्मुख करायला लावणारे मुक्तचिंतन.
Dalpatsingh Yeti Gava (Natyanirmiti Prakriya) । दलपतसिंग येती गावा (नाट्यनिर्मिती प्रक्रिया)
या पुस्तकात ‘दलपतसिंग येती गावा’ या नाटकाविषयी फार थोडे बोलले गेले आहे, बहुतेक सर्वजण सांगत आहेत ते या नाटकाच्या निर्मितिप्रक्रियेविषयी. अरुणा रॉय यांनी राजस्थानातील देवडुंगरी या खेड्यातील मजूर-शेतकऱ्यांना घेऊन तिथल्या स्थानिक प्रस्थापितांच्या (राजकारणी, जमीनदार, प्रशासकीय अधिकारी) विरोधात दिलेला लढा आणि त्यातून उगम पावलेला माहितीच्या अधिकाराचा कायदा याची गोष्ट म्हणजे हे नाटक आहे. आणि अतुल पेठे यांनी जांबसमर्थ या गावात सात-आठ महिने तंबू ठोकून, तिथल्या लोकांना हाताशी धरून माहितीच्या अधिकारावरील जे नाटक उभे केले, त्याची हकीगत म्हणजे हे पुस्तक आहे.
सुंदर पत्रे । Sundar Patre
सुधा, तुला अण्णांनी लिहिली तशी पत्रे मराठीत पूर्वी कोणी लिहिली नव्हती आणि पुढेही कोणी लिहील असे वाटत नाही. काचेच्या पात्रात ठेवलेल्या सोनेरी माशांची प्रत्येक हालचाल ज्याप्रमाणे बाहेरून दिसते, त्याप्रमाणे तुला लिहिलेल्या प्रत्येक पत्रातून गुरुजींचे – तुझ्या अण्णांचे मन स्पष्ट दिसून येत असे. त्यांच्या मनाचे सारे भाव त्या पत्रांतून उमटलेले आहेत.
सुधाताई, तू मोठी भाग्याची. तुझ्या अण्णांचा थोरल्या भावावर जसा जीव होता तसाच तुझ्यावरही. देवाघरी जातानासुद्धा त्याचा फोटो त्यांनी आपल्या उजव्या खिशात ठेवला होता! गुरुजी नाना ठिकाणी हिंडत. नाना देश, नाना वेष, सृष्टीचे नाना प्रकार ते पाहत. त्यांची दृष्टी जरी भूमीकडे सदैव वळलेली दिसे, तरी त्यांच्या नजरेतून बारीकसारीक गोष्टदेखील निसटत नसे. त्यांची नजर जशी रत्नपारख्याची होती! ती चांगले तेवढे टिपून घेई आणि ज्यात आयब असेल, दोष असेल ते सोडून देई.
साऱ्या देशभर हिंडून आणि शेकडो ग्रंथ चाळून साक्षेपाने गोळा केलेल्या सुमधुर, सुरस, सुगंधी नि टपोर स्मृतींचे द्रोणच्या द्रोण भरून ते तुला दर शनिवारी पाठवीत. मग तू भाग्याची नाहीस का? आणि तुला पाठवलेल्या या भेटीचा स्वाद उभ्या महाराष्ट्रातल्या शेकडो, हजारो मुलांना गेले वर्षभर चाखायला मिळाला, हे त्यांचे भाग्य ! तुला लिहिलेली पत्रे महाराष्ट्रातील सर्व बाळगोपाळांचा वारसा होणार आहे, हे तुझ्या अण्णांना ठाऊक होते. त्यांच्यापाशी आप- परभावच नव्हता. श्यामची आई साऱ्या महाराष्ट्राची आई झाली, तशी अण्णांची तू सुधाताई साऱ्या महाराष्ट्राची सुधाताई झाली आहेस..
– ना. ग. गोरे
Reviews
There are no reviews yet.