महाराष्ट्र राज्य स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागांची स्थिती नेमकी आहे तरी कशी, याचा शोध घेण्यासाठी राजा शिरगुप्पे यांनी जुलै-ऑगस्ट 2009 मध्ये भ्रमंती केली, त्यातून साकारलेली ही शोधयात्रा. ही शोधयात्रा वाचताना लक्षात येईल, ‘दुर्गम भाग’ म्हणजे केवळ डोंगरदऱ्या वा जंगलप्रदेश नव्हे; जिल्ह्याच्या ठिकाणापासून दहा-वीस कि.मी. अंतरावरील परिसरही ‘दुर्गम’ या संज्ञेला पात्र ठरतो आहे!
Sale
₹250.00 ₹200.00
₹350.00 ₹280.00
₹350.00 ₹280.00
₹500.00 ₹400.00
₹200.00 ₹160.00
₹150.00 ₹120.00
₹550.00 ₹440.00
₹175.00 ₹140.00
शोधयात्रा : ग्रामीण महाराष्ट्राची | Shodhyatra : Gramin Maharashtrachi
शोधयात्रा : ग्रामीण महाराष्ट्राची (रिपोर्ताज) – महाराष्ट्र राज्य स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाली तेव्हा, ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागात भ्रमंती करून टिपलेली क्षणचित्रे.
Meet The Author
शोधयात्रा : ईशान्य भारताची | Shodhyatra : Ishanya Bhratachi
शोधयात्रा : ईशान्य भारताची (रिपोर्ताज) – ईशान्य भारतातील सात राज्यांत भ्रमंती करून, तेथील समाजजीवन रेखाटणारे लेखन.
Weight | 0.15 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 136 |
Be the first to review “शोधयात्रा : ग्रामीण महाराष्ट्राची | Shodhyatra : Gramin Maharashtrachi” Cancel reply
Related products
झुंडीचे मानसशास्त्र | Zundiche Manasashastra
झुंडीचे मानसशास्त्र अवगत असणे, ही गोष्ट अनेक लोकांच्या दृष्टीने फायद्याची असते. जगातील मोठमोठे कर्तबगार पुरुष, धर्मप्रवर्तक, साम्राज्यांचे संस्थापक, भिन्न-भिन्न विचारसरणींचे निष्ठावंत अनुयायी, प्रसिद्ध राजकारणपटू हे सर्व जण प्रच्छन्न मानसविशारद होते. झुंडींची मानसिक जडण-घडण कशी असते, हे या सर्वांना जणू जन्मतः कळते. या उपजत आणि अचूक ज्ञानाच्या जोरावरच ही मंडळी स्वत:चे श्रेष्ठत्व प्रस्थापित करू शकतात. झुंडीचे मानसशास्त्र अवगत असणे, ही गोष्ट राजकारणामध्ये पुढारीपण करू इच्छिणाऱ्यांना निकडीची होऊन बसली आहे. हे ज्ञान असेल, तरच झुंडींवर ताबा चालवता येणे शक्य असते. अर्थात, ही गोष्ट वाटते तितकी सोपी नसते. तथापि, हे ज्ञान असेल तर निदान ती व्यक्ती झुंडीच्या आहारी तरी जात नाही.
वाचावे कसे हे शिकवण्यासाठी ‘नवी क्षितिजे’ हे त्रैमासिक दीर्घकाळ चालवणाऱ्या आणि थोडेच पण विशेष महत्त्वाचे गंभीर वैचारिक लेखन करणाऱ्या विश्वास पाटील यांनी लिहिलेले ‘झुंडीचे मानसशास्त्र’ हे पुस्तक दोन वेगवेगळ्या पुस्तकांवर आधारित आहे. त्या दोन पुस्तकांचे लेखक वेगवेगळ्या कालखंडातील, वेगवेगळ्या देशांतील आणि वेगवेगळ्या भाषांतील आहेत. त्यातील पहिले पुस्तक आहे ‘द क्राउड’, ल बाँ यांनी लिहिलेले हे पुस्तक मूळ फ्रेंच भाषेतील असून त्याचा इंग्रजी अनुवाद 1896 मध्ये प्रसिद्ध झाला. दुसरे पुस्तक आहे ‘द ट्रू बिलिव्हर’, एरिक हॉपर या अमेरिकन लेखकाने 1951 मध्ये हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. विश्वास पाटील यांनी ती दोन पुस्तके अनुक्रमे ‘झुंडी’ आणि ‘सच्चा अनुयायी’ या स्वरूपात सुबोध मराठीत आणली, आणि ‘झुंडीचे मानसशास्त्र’ हे एकसंध पुस्तक तयार केले. हे दोन्ही भाग परस्परांना पूरक आहेत, एवढेच नव्हे तर परस्परांचा आशय व विषय पुढे घेऊन जाणारे आहेत. 1978 मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती जनपथ प्रकाशन, मुंबई यांच्याकडून आली आणि नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून 2020 मध्ये आली. चार दशकांनंतरही हे पुस्तक अधिकाधिक प्रस्तुत ठरते आहे.
(पहिली आवृत्ती – जनपथ प्रकाशन, मुंबई. 1978)
व्यक्ती आणि व्याप्ती | Vyakti Ani Vyapti
शिक्षक, प्राध्यापक, कार्यकर्ता, पत्रकार, लेखक, संपादक आणि समीक्षक असे प्रमुख आयाम असलेल्या विनय हर्डीकर यांच्या लेखनकार्याचे विशेष महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे. मात्र रूढार्थाने लिहिली जातात तशी ही व्यक्तिचित्रे नसतात, त्यांना व्यक्तिविमर्श म्हणणेच योग्य ठरेल. कारण त्या-त्या व्यक्तीच्या विचारांचा वा कार्याचा गाभा व आवाका या लेखनाच्या केंद्रस्थानी असतो. त्यामुळे कोणाही वाचकाच्या मनात त्या व्यक्तिविमर्शांचा सखोल ठसा उमटतो; इतका की ती व्यक्ती म्हणजे विनय हर्डीकरांच्या लेखात चित्रित झाली आहे तशीच असणार, असा समज त्या व्यक्तीला न ओळखणाऱ्यांचा होतो. आणि त्या व्यक्तीला आधीपासून ओळखत असणाऱ्या वाचकांना वाटते, आपल्याला आता कुठे ही व्यक्ती नीट समजली आहे.
कहाणी माहिती अधिकाराची । Kahani Mahiti Adhikarachi
कोंडून पडलेली भयग्रस्त राज्यव्यवस्था, गुदमरलेलं प्रजासत्ताक आणि कुपोषित लोकशाही या सगळ्याला मदतीचा हात कसा मिळाला, याची कहाणी या पुस्तकातून आपल्यासमोर उलगडत जाते. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, ‘घटनात्मक नैतिकता’ वाचवण्यासाठी सरसावलेला हा मदतीचा हात आहे. अनन्यसाधारण प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व असलेल्या अरुणा रॉय आणि त्यांचे सहकारी निखिल डे, शंकर सिंग, त्यांची पत्नी अंशी व त्यांच्यासोबत जोडल्या गेलेल्या इतर मंडळींनी मिळून 1990 मध्ये राजस्थानातील दुर्गम खडकाळ भागात ‘मजदूर किसान शक्ती संघटन’ या संस्थेची स्थापना कशी व का केली इथपासून प्रस्तुत पुस्तकाचं ‘कथानक’ सुरू होतं.
अनेक बेधडक अभियानं चालवून, निग्रहाने प्रतिकार करून, अटीतटीच्या वाटाघाटींना तोंड देऊन, कठोर निर्णय घेऊन, प्रसंगी हलाखी व छळ सहन करून या संघटनेने असाधारण धोक्यांचा सामना केला. अजाणपणाचा अंधार दूर करणं, कायदे व हक्क यांच्याविषयीची समजूत वाढवणं, दिवसाढवळ्या झोपा काढणाऱ्या प्रशासकांना जागं करण्यासाठी आवश्यक असलेला निर्धार व निधडेपणा दृढ करणं, या उद्देशाने हे प्रयत्न करण्यात आले. ही कहाणी अनपेक्षितरीत्या मिळालेल्या समर्थनाचीसुद्धा आहे. ‘हल्ल्याचं लक्ष्य’ असलेल्या नोकरशाहीमधल्याच काही जागरूक घटकांकडून या चळवळीला अनेकदा समर्थन मिळालं; शिवाय बुद्धिजीवी, लेखक, इतर बिगरसरकारी संस्था आणि दुर्गम ठिकाणच्या प्रबुद्ध भारतीय लोकमताकडूनही समर्थन मिळालं.
– गोपाळकृष्ण गांधी (प्रस्तावनेतून)
2005 मध्ये माहिती अधिकार कायदा अस्तित्त्वात आला, त्याला प्रामुख्याने कारणीभूत ठरला, 1990 नंतर अरुणा रॉय व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेला लढा. या लढ्याची कहाणी सांगणारे पुस्तक ‘द आरटीआय स्टोरी’ या नावाने आले. त्या पुस्तकाचा अवधूत डोंगरे यांनी केलेला हा अनुवाद.
Sane Gurujincha Pandharpur Mandir Pravesh Ladha | साने गुरुजींचा पंढरपूर मंदिर प्रवेश लढा
1 मे 1947 रोजी गुरुजींनी अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेले पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठीही खुले व्हावे यासाठी उपोषण सुरु केले… आणि मग दहा दिवसांच्या उपोषणानंतर ते मंदिर अस्पृश्यांसाठी खुले झाले. तो एकूण घटनाक्रम भारतीय समाजजीवनाच्या कुरूपतेचे दर्शन घडवणारा होता, मात्र शतकानुशतकांचे जडत्व लाभलेल्या रूढी परंपरा (उदात्त ध्येयवादाच्या बळावर) मोडीत काढता येतात, याची प्रचिती देणाराही होता. त्याची एक झलक अनुभवण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे.
अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट | Angry Young Secularist
अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट (लेख संग्रह) – हमीद दलवाई यांची एक मार्मिक मुलाखत, त्यांनी वसंत नगरकरांना लिहिलेली 13 पत्रे आणि दलवाईंवर इतर 13 मान्यवरांनी लिहिलेले लेख आदींचा समावेश या पुस्तकात आहे.
महाराष्ट्राच्या व भारताच्या संदर्भात, 1970 चे दशक संतप्त तरुणाईचे होते. त्या दशकात समतेच्या बाजूने व शोषणाच्या विरोधात अनेक चळवळी झाल्या, त्यात तरुणाईच आघाडीवर होती. 1965 ते 75 या काळात मुस्लीम समाजातील सुधारणांसाठी महाराष्ट्रातील एक तरुण झंझावतासारखा कार्यरत होता, त्याचे नाव हमीद दलवाई. दिलीप चित्रे या मित्राने त्याचे वर्णन ‘अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट’ असे केले होते. त्याच्या ध्येयवादाचा व दूरदृष्टीचा ट्रेलर पाहायचा असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवे.
There are 13 articles on Secular reformer Hamid Dalwai, written by his family members, friends , and dignitaries in the field of social work . It includes Husain Dalwai, A. B. Shaha, Dilip Chitre, Vijay Tendulkar, Bhau Padhye, Govind Talwalkar etc. We can understand the personality and thoughts of Dalwai
अवघी भूमी जगदीशाची | Avaghi Bhoomi Jagadishachi
देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्याचे काय हा प्रश्न अनिर्णित होता. त्या शोधप्रक्रियेचा भाग म्हणून 8 मार्च 1951 रोजी सर्वोदय संमेलन आणि तेलंगणाची यात्रा करायला विनोबा भावे निघाले. नलगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातील बैठकीत तेथील दलितांच्या समस्यांवर चर्चा चालू होती. तेव्हा रामचंद्र रेड्डी या व्यक्तीने त्यांच्या मालकीची 50 एकर कोरडवाहू आणि 50 एकर ओलिताची जमीन दान करण्याची घोषणा केली. त्या घटनेने ठिणगी पडली, त्या रात्री विनोबा झोपू शकले नाहीत. तो दिवस होता 18 एप्रिल 1951.
आणि मग दुसऱ्या दिवशीपासून सुरू झाले भूदान आंदोलन, नंतर त्याला ग्रामदानाची जोड मिळाली. तब्बल 13 वर्षे त्या आंदोलनाचा झंझावात देशातील विविध राज्यांतून चालूच राहिला, आणखी दशकभर त्याचा प्रभाव देशभर राहिला. त्या प्रक्रियेत एकूण 47 लाख एकर जमीन मिळाली आणि त्यातील 25 लाख एकर जमीन भूमिहीन शेतमजुरांना वाटली गेली. या संपूर्ण प्रक्रियेची कहाणी, शिवाय त्या आंदोलनाचे आणखी काय, किती व कसे परिणाम झाले, या सर्वांची अतिशय अभ्यासपूर्ण आणि तरीही कमालीची वाचनीय व रोचक अशी समीक्षा या पुस्तकात आहे.
Reviews
There are no reviews yet.